लक्ष असतं माझं या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण दररोज घडणाऱ्या बातम्यांमधील महत्वाच्या विषयावर काहीतरी नवीन बातमीच्या पलीकडील माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत असतो. या कार्यक्रमातून साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी दररोज समाजातील विविध विषयावर त्यांचे परखड मत मांडणार आहेत.Saam TV is Maharashtras number one 24hour news channel Laksha Asta Majha with renowned TV anchor and Saams editor in chief Mr Prasanna Joshi. Through the show, Prasanna Joshi discusses his take on all the recent political and current happenings. He also gives his personal views on what is going on in the country and the world. As the name suggests, the show revolves around Mr Joshis opinion on trending events in the country.
पावसाचं विचित्र झालेलं गणित, वाढती वस्ती, राजकारण्यांची स्वार्थी चालढकल, हवामान विभागाचं हवाई अनुमान, या सगळ्याची एकत्रित परिणती म्हणजे कधी इमारत कोसळणं, कधी चक्रीवादळ, कधी दरड कोसळणं तर कधी पूर येऊन शहराच्या शहर जलमय होणं. दरवर्षी तोच धडा, दरवर्षी तसंच रडा यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या vip गेटवर अदानींचे नाव ठळकपणे आल्यानं आज वाद पेटला. वस्तुतः या विमानतळाला शिवछत्रपतींचे नाव आहे. अशावेळी प्रवेशद्वार किंवा अन्य कुठेही कुणाचे नाव असण्याचा प्रश्नच नाही. मग, हा भलताच आत्मविश्वास येतो कुठून यावरच आहे आजचं लक्षअसतंमाझं
स्व. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार झालंय. यावरून देशात राजकीय वादही सुरू झालाय. मात्र, खरंच गांधी घराण्याची नावं या देशात ज्या घाऊक प्रमाणात देण्यात आली, त्याची ही प्रतिक्रिया आहे का की हा मोदीभाजपचा गांधीकाँग्रेस द्वेष आहे यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
अखेर काबूल तालिबान्यांच्या हातात पडलं. अफगाणिस्तानात तालिबानी राजवट प्रस्थापित झाली. मात्र, तालिबान हे सगळं ज्या ध्येयातून करतोय, त्या इस्लामी राजवटीच्या संकल्पनेची चर्चा होत नाहीये. याशिवाय, अफगाणिस्तानच्या ग्रेट गेममागच्या छुप्या सुत्रधारांच्या चेहऱ्यावर मोठा खुलासा लक्षअसतंमाझं
अफगाणिस्तानवर तालिबानने नियंत्रण मिळवलं आहे. भारताने यापूर्वीही आणि आताही तालिबानसोबत संबंध न ठेवण्याची भूमिका घेतलीये. मात्र, भारताच्या, द. आशियाच्या हितासाठी हे योग्य होईल का भावनेच्या भरात आपण व्यवहाराकडे दुर्लक्ष करतोय कायावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व मानायचं असेल, तर त्याची दोन उदाहरणे म्हणजे अभिनेत्री स्वरा भास्कर आणि ऑलिंपिकपटू नीरज चोप्रा. स्वरा तिच्या गृह पुजेमुळे हिंदुत्ववाद्यांच्या टिकेचं लक्ष्य ठरली, तर नीरजने पाकिस्तानी भालाफेकपटूबद्दलच्या काँट्रॅव्हर्सिवर स्पष्टीकरण दिलंय. काय आहेत हे विषय कोण आहेत जे इतरांची धर्मराष्ट्र निष्ठा ठरवतात यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
सध्या देशात नॅशनल मोनेटाइजेशन पाईपलाईनची चर्चा आहे. भाजपेतर पक्षांनी हे म्हणजे देश भाड्याने देण्याची दुर्बुद्धी म्हटलंय, तर भाजप सरकारने यातून सरकारला लोकोपयोगी प्रकल्पांसाठी पैसा उभा राहील, असा दावा केलाय. कोणती बाजू आहे खरी यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
परवा पुण्यात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने आपण सारे हादरलो आहोत. ही घटना पहिली नाही आणि दुर्दैवाने शेवटची असण्याचीही शक्यता नाही. मात्र, हे वाढते बलात्कार कशाचं द्योतक आहेत अशाने मुलीमहिलांनाच स्वातंत्र्याची किंमत द्यावी लागते त्याचं काय यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
भाजप नेते किरीट सोमय्यांनी गेले काही महिने सरकारमधील मंत्र्यांना आणि पर्यायाने सरकारलाही अडचणीत आणलंय. आता त्यांचं ताजं लक्ष्य मंत्री हसन मुश्रीफ आहेत. सोमय्यांना रोखण्याचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरलेत, सरकार जसजसे आक्रमक होतेय, तसे किरीट सोमय्या हिरो होतायत. त्यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
आझादी, आझादीच्या घोषणांनी आणि सरकारविरोधी तडाखेबंद भाषणांनी गाजलेला तरुण कन्हैया कुमार अखेर काँग्रेसवासी झालाय. मूळचा डाव्या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेला आणि भाकपमध्येही वरच्या फळीत गेलेल्या कन्हैयाला काँग्रेस हा पर्याय का वाटावा काँग्रेसवर काळासोबत नसल्याची टीका होत असताना उलट डावेच मागे पडलेत का कन्हैयाही प्रोफेशनल राजकारणी ठरला का यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
आरोग्य भरती परिक्षेचा कसा बोजवारा उडाला ते सामने दाखवलं. मात्र, इतरवेळी एखाद्या मंत्र्याबद्दल आरोप करायला पुढे येणारे किंवा कुणा अधिकाऱ्यांची कुंडली काढणारे असे किरीट सोमय्या किंवा नवाब मलिक या प्ररकणात पुढे आले नाहीत. यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
सरदार उधम ही फिल्म भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवली गेली नाही. त्यामागे चित्रपट निर्मिती मूल्य या दृष्टीने करणं असती तर ठीक होतं. मात्र, निवड समितीचे सदस्यच जेंव्हा म्हणतात की, या फिल्ममुळे ब्रिटिश द्वेष दिसतो, तेंव्हा मात्र संताप आल्याशिवाय राहत नाही. यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुन्द्रा याला पोर्न फिल्म कंटेंट बनवण्याच्या प्रकरणी अटक झालीये. मात्र, पोर्न कंटेंट हे भारतातील एक न्यू नॉर्मल झालंय. सेन्सॉर बोर्डाच्या जाचातून मुक्त अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवर हा कंटेंट अगदी प्रोफेशनल लेव्हलला बनवला जातोय. मात्र, यामुळे आपल्या पिढीतील प्रेम, रोमांसच्या संकल्पनाच बदलतायत का यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
लक्षअसतंमाझंच्या आजच्या पॉडकास्टमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात भक्तिमय वातावरणात आज साजरी होणाऱ्या आषाढी एकादशी आणि कोरोनामुळे वारकर्यांच्या काय भावना असतील याविषयावर साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी यांनी त्यांच्या भावना मांडल्या आहेत. लक्ष असतं माझं या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण दररोज घडणाऱ्या बातम्यांमधील महत्वाच्या विषयावर काहीतरी नवीन बातमीच्या पलीकडील माहिती तुमच्यापर्यंत पोहचवत असतो. या कार्यक्रमातून साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी दररोज समाजातील विविध विषयावर त्यांचे परखड मत मांडणार आहेत. तर दररोज ऐकायला विसरू नका लक्षअसतंमाझं
22 जुलै. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या राज्यातील महत्वाच्या व्यक्तिमत्वांचा आज जन्मदिवस. वेगळे पक्ष, वेगळी विचारसरणी, वेगळे राजकीय प्रदेश...मात्र, दैवगतीने हे दोघे काही काळ एकत्र आले. त्यांचं एकत्र येणं टिकलं नाही, मात्र समजा फडणवीसपवार सरकार टिकलं असतं तर या दोघांची केमिस्ट्री कशी राहिली असती यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी साम टीव्हीला दिलेली मुलाखत सध्या गाजतेय ती त्यातल्या एका प्रश्नावरील उत्तरामुळे. शिवरायांचं स्वराज्य हे स्वा. सावरकर म्हणतात तशी हिंदुपदपादशाही होती, असं पुरंदरे म्हणाले. या उत्तरामुळे आता नवे प्रश्न तयार होणार आहेत. यावर आता डॉ. हरी नरके आदी अभ्यासकांनी टीकाही सुरू केलीये. यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
फेसबुक, गुगलच्या लोकांनी काम सुरू केलंय. मोठमोठ्या देशांनी यावर लक्ष द्यायला सुरुवात केलीये. वर्क फ्रॉम होम ज्यांना क्रांती वाटत होती, त्यांनाही अचंबा वाटेल असा हा प्रकार आहे. तुमचं व्यक्तिमत्वच इंटरनेटवर अपलोड करून जगण्याचा अवतार आहे...मेटाव्हर्स. यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीपातीचे राजकारण सुरू झाल्याचं पुन्हा म्हटलं. मात्र, त्यांच्या न्यायाने देशात हिंदूमुस्लिम द्वेषाचं राजकारण कुणी सुरू केलं हाही प्रश्न विचारावा लागेल. यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
नवऱ्याकडून पत्नीसोबत बळजबरीने जरी संभोग झाला, तरी तो बलात्कार ठरत नाही, असा निवडा छत्तीसगड उच्च न्यायालयाने दिलाय. न्यायालय कायद्यांना बांधील आहे, हे मान्यच. मात्र, समाज आणि देश म्हणून आपण हे मान्य करायचं का यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
भाजप नेत्या पंकजा मुंडे या आपल्या मुलाला उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत सोडायला गेल्या. त्याबद्दलची पोस्टही त्यांनी शेअर केली. मात्र, त्यावर ट्रोलिंगच जास्त झालं. अर्थात, त्यातील काही मुद्दे नक्कीच विचारात पाडणारे आणि राजकारण्यांचे डोळे उघडणारे आहेत. यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
गेल्या काही दिवसात ST कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची बातम्या आल्या. मात्र, हा महाराष्ट्र जणू काही झालेलंच नाही अशा अविर्भावात बुलेट ट्रेन, समृद्धी मार्गाचे गोडवे गातोय. आपली संवेदनशीलता इतकी मेलीये यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला. मोठ्या कष्टाने अनेक मुलंमुली उत्तीर्ण होऊन आता IAS, IPS होतील. मात्र, त्यांचं कौतुकही जात पाहून होताना दिसलं. जातनिहाय याद्या फिरू लागल्या. अगदी प्रादेशिक अस्मिताही दिसू लागल्या. यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
NCB चे अधिकारी समीर वानखेडे आणि मविआ सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यात सध्या वाद सुरू आहे. आर्यन खान अटकेनंतर सुरू झालेलं हे प्रकरण आता व्यक्तिगत होताना दिसतंय. मात्र, सरकारी मंत्री विरुद्ध सरकारी अधिकारी हे चित्र अंतिमतः शासनालाच मारक ठरणार नाही का यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
सध्या कोरोनाकाळातही अनेक राजकीय कार्यक्रमात झालेल्या गर्दीवर मोठी टीका होतेय. त्यातच आता बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलांच्या विवाहावेळी झालेल्या गर्दीवरून टीका सुरू झालीय. एकीकडे रेल्वे बंद, नाट्यगृह बंद, इतर सामान्य लोकांच्या कार्यक्रमांवर नियम, मग राजकारण्यांना वेगळा न्याय का यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
सध्या आपले राज्यपाल कोशयारी भलतेच फॉर्ममध्ये आहेत. विधान परिषदेतील 12 सदस्यांची नियुक्ती राहिली दूरच, मात्र साहेब सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. अधिकाऱ्यांना भेटीसाठी बोलावताहेत. यावर म.वि.आच्या नेत्यांनी मात्र आक्षेप घेतलाय. राज्यपाल दुसरं सत्ताकेंद्र चालवतायत असा आरोप केलाय. यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
राज्याला OBC सूची बनवण्याची मुभा देणाऱ्या विधेयकावर आज संसदेत फैसला होतोय. हे विधेयक दोन्ही सभागृहात पारित होण्याची चिन्ह आहेत. यामुळे, OBC मध्ये समाविष्ट होण्यासाठी संघर्ष करणाऱ्या देशातील अनेक समूहांच्या लढ्याला यश येण्याची शक्यता आहे. शिवाय, जाती आधारित जनगणनाही याद्वारे महत्वाची ठरू शकेल. यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
आज दिवसभर राणे प्रकरणावरून जे झालंय, त्यामुळे सेना आक्रमक झालेली दिसली, भाजपही स्वस्थ बसणार नाही, हे फडणवीस सूचित करतायत. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना कोंबडा वगैरे म्हटलं जातंय. मात्र, या सर्व घडामोडीमागे आहे खोल राजकारण. यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
गॅस, डिझेल, पेट्रोल अश्या GDPच्या दरवाढीवरून काँग्रेसचे राहुल गांधी यांनी भाजपवर टीका केली. त्यावरून, जोरदार राजकीय आरोपप्रत्यारोपही झाले. मात्र, राजकारणापलीकडे जाऊन पाहता महागाई हे आजचं वास्तव आहे की नाही यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
भारताला फक्त 99 वर्षांपुरता लीजवर स्वातंत्र्य मिळालं, असं विधान भाजप युवा मोर्चाच्या रुची पाठक यांनी एका कार्यक्रमात केलं. यावर त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात आलं. मात्र, सोशल मोडिया वरचे पडताळणी न केलेले मेसेज आणि व्हाट्सएप युनिव्हर्सिटीचे लोक कसा भ्रम पसरवू शकतात ते यातून कळलं. मात्र, हा प्रकार किती घातक असू शकतो, त्यावरच आहे आजचा लक्ष असतं माझं
जय भीम या नावाची एक तमिळ फिल्म आलीये. लीगल ड्रामा आहे. वंचित समूहाला ठरवून टार्गेट कसं केलं जातं, त्याचं चित्रण आहे. OTT वरही ही फिल्म आलीये. मात्र, आजही बॉलिवूड सामाजिक वास्तवाला धरून, वेगळा विचार देणाऱ्या फिल्म बनवतं का यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
फॅब इंडियाच्या जाहिरातीपासून सुरू झालेला वाद आता जाहिरात करणाऱ्या महिलांच्या टिकली लावणं/न लावण्यापर्यंत आलाय. यावरून आता टिकली नसलेल्या मॉडेल नसतील तर त्या सेवाउत्पादनांवर बहिष्कार घालण्याची भाषा बोलली जाऊ लागलीये. सोशल मिडीयाचा आणखी एक ट्रेंड, यापलीकडे काय आहे या प्रकाराचं गांभीर्य यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
कधी तनिष्क, कधी मान्यवर तर कधी फॅब इंडिया...गेल्या काही दिवसात हे ब्रॅण्डस त्यांच्या जाहिरातीवरून हिंदुत्ववाद्यांच्या टार्गेटवर आले. लगेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध दडपशाही असा वाद सुरू झाला. मात्र, याकडे वेगळ्या नजरेने बघता येईल का यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
शरद पवार हे शांत स्वभावाचे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पवार आक्रमक होताना पाहायला मिळतायत. सहकार क्षेत्रावर केंद्राचे अप्रत्यक्ष दडपण असो की लखीमपूरमावळ वाद, पवार बेधडक बोलतायत. यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
लोक मीडियाला नावं ठेवतात, पण चर्चा मसालेदार बातम्यांचीच करतात. महेश मांजरेकरांचा आगामी गोडसे हा पिक्चर आणि शाहरुखचा मुलगा आर्यनची ड्रग्ज कॉन्ट्रोव्हर्सि ही याचीच उदाहरणं मग, उत्तर प्रदेशातील लाखीमपूरमध्ये शेतकऱ्यांचं काय झालं, कुणाला फरक पडतो यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, अभिनेते अतुल पेठे यांचं शब्दांची रोजनिशी हे नाटक पोलिसांनी कोरोनाचं कारण पुढे करत होऊ दिलं नाही. खरं तर नाटकावेळी सर्व प्रतिबंधात्मक काळजी घेतली जाणार होती. पण, राजकीय सभा, मोर्चे, मिरवणुका इथं गुमान राहणारे पोलीस कलाकारांना मात्र सर्व नियम लावतायत. यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
समर्थकांनो, तुम्हीही चुकतायचिपळूण, महाडमधल्या अतिवृष्टीनंतर नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आपल्या सहकाऱ्यांसोबत दौरा केला. मात्र, एकेठिकाणी एक महिला आपलं गाऱ्हाणे मांडत असताना, आमदार भास्कर जाधव जसे वागले त्यावर जोरदार टीका झाली. सामनेही हा मुद्दा लावून धरला. जाधवांनी यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय, समर्थक तर आमच्यावर तुटून पडलेत. त्या महिलेच्या नंतर आलेल्या वक्तव्याचाही दाखला दिला जातोय. मात्र, हा सगळा प्रकार इतका वरवरचा नाही.यावरच आहे आजचा लक्षअसतंमाझं
बहुत हुई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार म्हणत मोदी पंतप्रधान झाले, त्यांचं सरकार आलं. मात्र, सध्या परिस्थिती काय आहे पेट्रोल 100पार, तेलाचे, भाज्यांचे भाव कडाडले त्यात लॉकडाऊन. सामान्य घायकुतीला आलाय. यावर मोदी एखादी मन की बात सांगतील यावरच आहे आजचा लक्ष असतं माझं
Marathi
News
1