thumb podcast icon

इतिहास पुराणातील कथा Itihas Puranatil Katha

U • Mythology

श्रोतेहो नमस्कारखास तुमच्यासाठी सूत्रधार घेऊन येत आहे, इतिहास आणि पुराणातल्या निवडक कथा. या पॉडकास्टद्वारे तुम्ही आम्ही आपण सगळेच अनेक पौराणिक कथांशी जोडले जाणार आहोत. ह्या कथा महाभारत, शिव पुराण, रामायण यांसारख्या अनेक ग्रंथांमधून आम्ही निवडल्या आहेत. दर बुधवारी तुम्ही आमचा हा पॉडकास्ट आपण ऐकू शकाल तोही तुमच्या आवडत्या ऑडियो प्लेटफार्म वर. त्याचबरोबर सूत्रधार द्वारे प्रसारित करण्यात येणारे इतर विषयांचे पॉडकास्टस सुद्धा तुम्ही ऐकू शकाल. जसं की नलदमयंती प्रेम कथा, मिनी टेल्स पॉडकास्ट, श्री राम कथा आणि वेद व्यासांचे महाभारत.तेव्हा भेटूया, बुधवारी आमच्या पहिल्या वहिल्या एपिसोडसहhttps://play.google.com/store/apps/detailsidcom.sutradhar

  • कुबेराची भगवान शंकरांशी मैत्रीची कथा
    8 min 55 sec

    धन संपत्तीची देवता म्हणून सगळे कुबेराला ओळखतात. परंतु त्यांच्या पूर्वजन्माची कथा मात्र फारच थोड्या लोकांना माहित आहे. शिव पुराणातील या प्रसंगात ऐकूया, की मंदिरात चोरी करणाऱ्या चोराने अजाणतेपणाने केलेल्या कृत्यामुळे त्याला कशाप्रकारे कुबेर पद प्राप्त झालं. आणि कशाप्रकारे त्याला शंकराला प्रिय झाला. काम्पिल्य गावात यज्ञदत्त नावाचा एक ब्राम्हण राहत होता. त्यांना एक गुणनिधी नावाचा मुलगा होता. गुणनिधी अगदी आपल्या नावाच्या विरूध्द वागत असे. तो दुर्गुणी आणि उध्दट होता. त्याच्या या वागण्याला कंटाळून यज्ञदत्तने गुणनिधीचा त्याग केला. त्याला घरातून हाकलले. घरातून बाहेर पडल्यानंतर बरेच दिवस तो उपाशीपोटी भटकत राहिला. एके दिवशी मंदिरातील दान चोरण्याच्या हेतूने तो शंकराच्या मंदिरात गेला. तिथे त्याने आपली वस्त्र जाळून प्रकाश केला. हे कृत्य म्हणजे एकप्रकारे भगवान शंकराला दिप दान केल्यासारखेच झाले. चोरीच्या अपराधात त्याला पकडून मृत्यूदंडाची शिक्षा सुनीवण्यात आली. त्याच्या चुकीच्या कृत्यांमुळे यमदूतांनी त्याला बांधून घातले. मात्र शिवगणांनी तिथे येऊन त्याची सुटका केली. भगवान शंकराच्या गणांसोबत राहिल्यामुळे त्याचे मन शुध्द झाले. त्यानंतर गुणनिधी त्या शिवगणांसोबत शिवलोकात गेला. तिथे साऱ्या दिव्य शक्तींचा उपभोग घेतल्यामुळे तसेच शंकर पार्वतीची सेवा केल्यामुळे पुढचा जन्म त्याला कलिंगराज अरिंदम याचा पुत्र म्हणून मिळाला. कलिंगराज याने आपल्या पुत्राचे नाव दम असे ठेवले. दम सतत शिवाच्या आराधनेत असे. लहान असूनसुध्दा तो इतर लहान मुलांसोबत शिव शंकराची भजने गात असे. तारूण्यावस्थेत असताना त्याच्या पित्याचे निधन झाले. त्यानंतर कलिंगच्या सिंहासनावर दम बसला. राजा दम अत्यंत उत्साहाने आणि प्रसन्नतेने सर्वत्र शंकराच्या उपासनेचा प्रसार करू लागला. त्याने आपल्या राज्यातील सर्व गावांमध्ये शिव मंदिरात दिप दानाच्या प्रथेचा प्रचार सुरू केला. त्याने सर्व गावातील प्रधानांना सूचना दिल्या की, त्यांच्या गावाच्या आसपास जेवढीही शंकराची मंदिरे असतील त्या सर्व मंदिरांमध्ये अखंड दिप तेवत राहिला पाहिजे. आयुष्यभर या धर्माचे पालन केल्यामुळे दम राजाकडे मोठी धार्मिक संपत्ती निर्माण झाली. त्यामुळे मृत्यूनंतर तो अलकापुरीचा राजा झाला. ब्रम्हदेवांचा मानसपुत्र पुलस्त्य याचा पुत्र विश्रवा. आणि विश्रवाचा पुत्र वैश्रवण म्हणजे म्हणजेच कुबेर. त्याने पूर्वजन्मी भगवान शंकराची आराधना करून विश्वकर्माने निर्माण केलेल्या या अलकापुरीचा उपभोग घेतला. त्या युगाची समाप्ती होऊन मेघवाहन युगाची सुरूवात झाली. त्यावेळी यज्ञदत्ताचा पुत्र ज्याने प्रकाश दान केला होता तोच कुबेराच्या रूपामध्ये अत्यंत कठीण अशी तपश्चर्या करू लागला. दिप दानामुळे शंकराकडून मिळणाऱ्या आशिर्वादाच्या ताकदीबद्दल त्याला माहिती होती. त्यामुळे तो शिवाच्या काशी नगरीत गेला. तिथे तो अनन्य भक्तीने, प्रेमाने आणि तन्मयतेने अगदी निश्चल होऊन अकरा रूद्रांचे ध्यान करू लागला. अनेक वर्षे अशी तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकर पार्वती देवीसह प्रकट झाले. भगवान शंकरानी अत्यंत प्रसन्नतेने अलकापती कुबेराला पाहिले. आणि म्हणाले, अलकापती, तुझ्या तपश्चर्येने मी प्रसन्न झालो आहे. तुला वर देण्यासाठी मी तयार आहे. तुझी मनोकामना मला सांग. ही वाणी ऐकून कुबेराने डोळे उघडून पाहिले. तर प्रत्यक्ष भगवान शंकर त्याच्या समोर उभे असलेले त्याला दिसले. प्रातःकालच्या सूर्यासारख्या हजारो सूर्यांच्या तेजाने भगवान शंकर तेजस्वी झाले होते तर माथ्यावरची चंद्रकोर चमकत होती. शंकरांच्या या तेजामुळे कुबेराचे डोळेच मिटले. कुबेराने आपले डोळे मिटून घेतले आणि आपल्या मनातील भगवान शंकरांशी तो बोलू लागला. नाथ, माझ्या डोळ्यांना आपण अशी दिव्य दृष्टी द्या की मी आपले तेजस्वी रूप पाहू शकेन. आपले प्रत्यक्ष दर्शन हात माझ्यासाठी खूप मोठा वर आहे. मला दुसरा कोणताच वर नको. कुबेराचे हे बोलणे ऐकून भगवान शंकरांनी आपला हात त्याच्या डोक्यावर ठेवला आणि आपले दिव्य रूप पाहण्याची शक्ती त्याला प्रदान केली. दृष्टिची शक्ती मिळाल्यानंतर यज्ञदत्ताच्या पुत्राने डोळे उघडले आणि त्याची नजर पार्वती देवीवर पडली. देवीला पाहून त्याच्या मनात विचार आला की, भगवान शंकरांसोबत ही सर्वसुंदरी कोण आहे यांनी असा कोणता तप केला जो माझ्या तपश्चर्येपेक्षाही खडतर आहे. हे रूप, हे प्रेम, हे सौभाग्य आणि असीम सौंदर्य सारेच किती अद्भुत आहे.तो ब्राम्हणकुमार पुन्हा पुन्हा हेच बोलून देवीकडे निरखून पाहू लागला. त्याच्या या विचित्र वागणुकीमुळे त्याचा डावा डोळा फुटला. यावर देवी पार्वती, भगवान शंकराला म्हणाली, हा दुष्ट तपस्वी सारखा सारखा माझ्याकडे पाहून काय अर्वाच्य बोलत आहे देवीच्या या प्रश्नावर हसत हसत भगवान शंकर म्हणाले, हा तुझाच पुत्र आहे आणि हा तुझ्याकडे नजरेने पाहत नाहीय तर तुझ्या अमाप तप संपत्तीचे गुणगान गात आहे. देवीला असे समजावून भगवान शंकर कुबेराला म्हणाले, वत्सा मी तुझ्यावर प्रसन्न होऊन तुला वर देतो की, तु धनाचा राजा तसेच यक्ष, किन्नर आणि राजांचादेखील राजा होशील. पुण्यवान लोकांचा पालक आणि सर्वांसाठी धनाचा दाता होशील. माझ्या सख्या, तुझ्याशी कायम माझे मैत्र राहिल. आणि नेहमीच मी तुझ्या सोबत वास करेन. तुझ्याशी स्नेह वाढवण्यासाठी मी अलकापुरीजवळच वास्तव्य करेन. ये, पार्वती देवीला चरणस्पर्श कर. ही तुझी माता आहे. महाभक्त यज्ञदत्त पुत्र, अत्यंत प्रसन्नचित्ताने तु या पावलांचा आशीर्वाद घे. अश्याप्रकारचा आशीर्वाद दिल्यानंतर भगवान शंकर, पार्वती देवीला म्हणाले, देवेश्वरी, याच्यावर कृपा कर. तपस्विनी, हा कुबेर,तुझाच पुत्र आहे. भगवान शंकरांनी असे वृत्त कथन केल्यानंतर जगदंबा पार्वती प्रसन्न होऊन यज्ञदत्त पुत्राला म्हणाली, वत्सा, भगवान शंकराचरणी ही तुझी निर्मल भक्ती कायम राहू दे. महादेवांनी तुला जे वर दिले आहेत अत्यंत सुलभतेने तुला त्याच रूपात लाभूदेत. माझ्या रूपाची तुला जी ईर्षा झाली त्यामुळे तु कुबेर या नावाने प्रसिध्द होशील. अश्याप्रकारे कुबेराला वरदान देऊन भगवान शंकर पार्वतीसह स्वगृही निघून गेले. आणि अश्याप्रकारे भगवान शंकरांशी मैत्र प्राप्त करून कैलास पर्वताजवळ अलकापुरीला त्यांचे निवासस्थान झाले.                      

  • गरुडाच्या जन्माची गोष्ट
    7 min 15 sec

    पक्षीराज गरूड़चा जन्म कसा झाला तो सापांचा शत्रू आहेआपल्या नाग पुत्रांच्या मदतीने कद्रूने कपटाने विनता विरुद्ध पैज जिंकली आणि विनता तिची दासी बनून राहू लागली. आपल्या पहिल्या पुत्राच्या अरूणच्या शापामुळे दास्यत्वाचे जीवन जगणारी विनता त्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्या दुसऱ्या पुत्राच्या जन्माची प्रतीक्षा करू लागली. योग्य वेळ येताच विनताच्या दुसऱ्या अंड्यातून महाशक्तीशाली गरूडाने जन्म घेतला. त्याची शक्ती गती दीप्ती आणि बुद्धी विलक्षण होती. डोळे वीजेसमान पिवळे आणि शरीर अग्नीसम तेजस्वी होतं. जेव्हा आपले विशालकाय पंख फडफडवत तो आकाशात भरारी घेत असे तेव्हा वाटे साक्षात अग्नीदेवच येत आहेत. जेव्हा गरूडाने आपल्या आईला दासीच्या रूपात पाहिलं तेव्हा त्याने तिला त्याचं कारण विचारलं. विनताने गरूडाला कद्रू सोबतच्या पैजे विषयी संगितले.

  • भ्रूशुंडी ऋषींची कथा
    6 min 48 sec

    नामजपाने प्रसन्न होऊन गजाननाने आपल्या भक्ताला साक्षात आपले रूप बहाल केले त्या निस्सीम गणेश भक्ताची नामा कोळ्याची अर्थात भ्रूशुंडी ऋषींची कथा. घनदाट अशा दंडकारण्यात नामा कोळी आणि त्याचे कुटुंब राहात असे.नामा कोळी तिथून येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूंना लुटून त्यांची हत्या करून आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. तीच त्याची दिनचर्या होती. एके दिवशी समोरून मुद्गल ऋषी हातात कुबडी आणि कमंडलू घेऊन येत होते.नामा कोळ्याने त्यांना पाहिलं. तो आपली कुऱ्हाड घेऊन त्यांना मारण्यासाठी पुढे सरसावला परंतु त्याने हात उगारताक्षणी त्याच्या हातातली कुऱ्हाड मागच्यामागे गळून पडली, असे तीन वेळा झाले. नामा कोळ्याला काय घडते आहे हे कळेना.त्याची ती अवस्था बघून मुद्गल ऋषी त्याला म्हणाले, अरे, उचल कुन्हाड, मार मला काय झालं तुझी कुऱ्हाड अशी खाली का पडली ” हे ऐकून नामा कोळ्याला फार राग आला. त्याने पुन्हा वार करण्यासाठी कुन्हाड उगारली पण पुन्हा तेच.   

  • महर्षि वाल्मीकिंची प्रेरणा
    8 min 2 sec

    रामायणाचे रचनाकार महर्षी वाल्मिकीना आद्यकवी अर्थात सगळ्यात पहिले कवी असं म्हटलं जातं. आणि त्यांनी रचलेल्या श्रीराम कथेला पहिलं महाकाव्य मानलं जातं.एकदा तिन्ही लोकी भ्रमण करणारे त्रिलोकज्ञानी देवर्षी नारद आणि तपस्वी वाल्मिकी दोघांची भेट झाली.वाल्मिकीनी नारद मुनींना विचारलं, देवर्षी सांप्रत काळात विश्वात गुणवान, वीर्यवान, धर्मज्ञ कृतज्ञ, सत्यवादी. धर्मानुसार आचरण करणारा, प्राणिमात्रांचं हित चिंतणारा, विद्वान, समर्थ, धैर्यवान, क्रोधावर विजय मिळवणारा, तेजस्वी, 

  • नारदमुनींच्या नावाची कथा
    6 min 13 sec

    एके दिवशी नारदमुनी मनुचा पुत्र प्रियव्रताला भेटायला गेले. प्रियव्रताने ज्ञानी ऋषी नारदांचं सन्मानानं स्वागत केलं आणि यथोचित आदरातिथ्य केलं.ज्ञान प्राप्तीच्या इच्छेपोटी त्यानं नारदमुनींना अनेक प्रश्न विचारले, पण त्याची ज्ञानर्जनाची तहान काही शमेना. त्याने नारदमुनींना प्रश्न केलामुनिवर जेंव्हा काहीही घडणार असेल तेंव्हा देवांना त्याचे पूर्वानुमान असते,पण मला तुमच्याकडून अशा घटनेबद्दल जाणून घ्यायचे आहे जी अद्भुत आणि विचित्र असेल” नारदमुनींनी अगदी प्रसन्न चित्ताने स्वतःशी निगडीत एक विचित्र आणि अद्भुत घटना सांगितली ती अशीकी ते साक्षात माता सावित्रीलाच ओळखू शकले नव्हते. एकदा नारदमुनी श्वेतद्वीप नावाच्या क्षेत्री गेले होते. हे स्थळ तिथल्या सुंदर सरोवराकरिता प्रसिद्ध पावले होते आणि नारदमुनीत्या सरोवराचं सौदर्य पाहण्यासाठी आतुर होते. तिथे पोचल्यावर त्यांनी पाहिलं की सरोवर कमळाच्या फुलांनी भरलेलं आहे आणि एक सुंदर स्त्री एखाद्या पुतळ्यासारखी तेथे निश्चल उभी आहे. 

  • कावळा चाले हंसाची चाल
    6 min 47 sec

    द्रोणाचार्यांच्या मृत्यू पश्चात दुर्योधनाने कौरवांच्या सेनेचा सेनापती म्हणून कर्णाची नियुक्ती केली. कर्णाने दुर्योधनाला शब्द दिला की तो अर्जुनाचा वध करेल... आणि युद्धात दुर्योधनाचा विजय निश्चित करेल.आपण अर्जुनापेक्षा सर्वतोपरि कसे श्रेष्ठ आहोत हे तो दुर्योधनाला पटवून देत होता. मात्र कर्ण म्हणाला, की अर्जुनाकडे सारथ्याच्या रूपात कृष्ण आहे... मग त्याने प्रस्ताव मांडला की जर शल्य त्याचा सारथी बनलातर तो अर्जुनाच्या बरोबरीचा होईल. दुर्योधनाने शल्याच्या घोडे हाकण्याच्या कौशल्याची प्रशंसा केली केली.... तसेच तो असेही म्हणाला की या बाबतीत तो कृष्णाच्या बरोबरीचा आहे.आणि त्याने शल्याला कर्णाचा सारथी बनवण्याचे आश्वासन दिले. शल्याने कर्णाचा रथ चालवत असताना त्याला एक गोष्ट सांगितली... ती अशी...

  • Morya Gosawi(मोरया गोसावी)
    11 min 56 sec

    मोरया गोसावी महाराज चौदाव्या शताब्दीतले गाणपत्य संप्रदायातील संत होते. मोरगांवी जन्मलेले गोसावी गणपतिने दिलेल्या संकेतानुसार  पुण्याजवळ चिंचवड या गावी जाऊन स्थायिक झाले. चिंचवड़ मधे त्यांनी भव्य गणेश मंदिराची निर्मिती केली आणि तिथेच त्यांनी समाधि घेतली. सूत्रधार ची ही प्रस्तुति गणेशभक्त मोरया गोसावींना समर्पित आहे.

  • ईला आणि बुध
    10 min 25 sec

    वैवस्वत मनु आणि महाराणी श्रद्धा यांना बरीच वर्ष संतती नव्हती. म्हणून पुत्रप्राप्तीसाठी त्यांनी महर्षि वसिष्ठांच्या उपदेशानुसार, भगवान मित्र आणि वरुण यांची उपासना करण्याचा निर्णय घेतला. वसिष्ठ ऋषींच्या पाठबळामुळे मनूने पुत्रेष्टि यज्ञ करण्याचं ठरवलं. त्याने भगवान मित्र आणि वरुण यांच्याकडे आपल्या वंश पुढे चालावा म्हणून पुत्रप्राप्तीची इच्छा व्यक्त केली होती, परंतु विधिलिखित काही वेगळंच होतं. 

  • जरसंधाचा मथुरेवर हल्ला
    8 min 57 sec

    श्रीकृष्णाच्या हातून झालेल्या कंसाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी क्रोधाने आंधळा झालेल्या जरसंधाने मथुरेवर हल्ला करायचे ठरवले. जरसंधाने आपल्या सेनेसह मधुरेला घेरले आणि श्रीकृष्णबालरम दोघांना युद्धाचे आव्हान दिले. मथुरावासीयांनी श्रीकृष्ण आणि बालरम दोघांचा पराक्रम या पूर्वीही पाहिला होता त्यामुळे ते निश्चिंत होते. श्रीकृष्ण आणि बलराम दोघांनी आपल्या यादव सेनेला जरसंधाच्या सेनेसमोर आणून उभे केले. मगधाच्या सेनेचे संख्याबळ जास्त असले तरी तिच्याकडे कृष्णबलरामाच्या सेने सारखे युद्ध कौशल्य नव्हते.  जेव्हा जरासंध आणि बलराम दोघांचा एकमेकांशी सामना झाला तेव्हा जरासंधाला बलराम एक असा कोवळा तरुण वाटला जो त्याच्या समोर अजिबातच टिकू शकणार नाही... म्हणूनच जरासंधाने बलरामाला द्वंद्व युद्धाचे आव्हान दिले. जरासंधासोबत द्वंद्व युध्द करण्यासाठी उतावीळ झालेल्या बलरामाला पाहून श्रीकृष्णाच्या चेहर्‍यावर हसू पसरलं. दोन्ही योद्धा लढू लागले आणि काही वेळातच बलरामाने जरसंधाला परास्त केले.  बलराम, जरासंधाला जमिनीवर आपटून आता आपल्या गदेने त्याच्यावर प्रहार करणार तोच त्याला हाक ऐकू आली, दादा थांबा   चकित होऊन बलरामाने आपल्या छोट्या भावाकडे श्रीकृष्णाकडे पहिलं आणि जरासंधाच्या छातीवर पाय ठेऊन श्रीकृष्णाला विचारलं, तुझा नक्की हेतू काय आहे. आज मी याचा काल बनून याचं जीवन समाप्त करू शकतो, तर मग तू मला का थांबवतो आहेस  हसतहसत श्रीकृष्ण उत्तरला, आपण नुकताच याच्या जावयाचा वध करून याच्या मुलींना विधवा केलं आहे त्यामुळे त्याचं असं संतापणं रास्त आहे. याला शहाणपण शिकण्यासाठी आपण अजून एक संधी दिली पाहिजे असं अर्ध्यात थांबवल्यामुळे बलराम चिडला होता पण त्याचा श्रीकृष्णाच्या बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास होता. बलरामाने आपली गदा खाली घेतली आणि जरासंधाच्या छातीवरून आपला पाय बाजूला करून रागाने म्हणाला, माझा विचार बदलायच्या आत जेवढा लांब जाऊ शकतोस तेवढा लांब निघून जा... जरासंध त्याचा असा अपमान झाल्यामुळे सूडाच्या भावनेने अधिक पेटून उठला. त्याच बरोबर तो हा धडाही शिकला की आपल्यापेक्षा वयाने लहान असलेल्या शत्रूला कमी लेखून चालणार नाही... त्यानंतर तो श्रीकृष्णाच्या सगळ्या शत्रूंच्या भेटी घेऊ लागला. ज्यात प्रमुख होते जरासंधाचा मित्र शाल्व, श्रीकृष्णाचा सावत्र भाऊ पौंड्रक, श्रीकृष्णाच्या आत्याचा मुलगा शिशुपाल आणि निषाद राज्याचे राजा आणि एकलव्याचे पिता दन्तवक्र हे सगळे श्रीकृष्ण आणि बलरामाचा वध करण्याच्या उद्देशाने जरासंधाला मदत करण्यासाठी एकत्र आले.  

  • गणपती जन्माची कथा
    12 min 25 sec

     श्रीगणेश पुराणानुसार गणेश जन्माची आणि त्याचं शीर हत्तीचं असल्याची कथा काहीशी अशी आहे. देवी पार्वतीच्या दोन सख्या होत्या जया आणि विजया. दोघी अत्यंत सदाचारी आणि विवेकी होत्या., आणि देवी पार्वती त्या दोघींचा मोठा आदर करी. एक दिवस त्या दोघी पार्वतीला म्हणाल्या, “सखी शिवजींचे इतके गण आणि तुझा एकही गण नाही. तुझा निदान एक तरी गण असायला हवा.उमा आश्चर्याने म्हणाली,असं का म्हणताय सख्यानो आपल्याकडे तर कितीतरी करोड गण आहेत, जे सदैव आपल्या आज्ञा पालनास तत्पर असतात.मग कशाला बरं अजून कुठल्या गणाची आवश्यकतासख्या म्हणल्या,ते सगळे गण महादेवांचे आहेत. त्यांचीच आज्ञा ते सर्वात आधी महत्वाची मानतात. नंदी, भृंगी साकाट सगळे गण तुझी आज्ञा तर मानतात पण प्रभू आशुतोषांची आज्ञाच त्यांच्यासाठी सर्वात महत्वाची आहे. जर तुम्ही काही आदेश दिला आणि शिवजींनी ती डावलली तर कुणीही गण तुमचा आदेश मानणार नाहीत. तुम्ही विचारलं तर नक्कीच ते काहीतरी बहाणा सांगतील. देवी पार्वती ने आपल्या सख्यांचं बोलणं ऐकलं पण काही काळानंतर ती ते विसरून गेली. एके दिवशी पार्वती स्नानासाठी चालली होती.जाताना तिने नंदिला आदेश दिला की त्याने द्वारपाल बनून कोणालाही आत जाण्यास अडवावं.नंदी दाराशी उभा राहिला. त्याच वेळी शंकर तिथे आले आणि आत जाऊ लागले. नदीश्वर त्यांना अडवत म्हणाला,स्वामीमाता आत स्नान करते आहे,त्यामुळे कृपया तुम्ही इथेच थांबावं.  शंकराने नदीचं बोलणं ऐकलं न ऐकलंसं करत आत प्रवेश केला. भगवंत आशुतोषाना अशा प्रकारे आत आलेलं पाहून देवी पार्वतीला आपल्या सख्यांच बोलणं आठवलं. तिच्या लक्षात आलं की सगळे गण शंकरांचे सेवक आहेत आणि त्यांचीच आज्ञा त्यांना महत्वाची वाटते. नंदीने आज माझ्या इच्छेचा उपमर्द केला आहे.जर माझा कुणी गण असता तर त्याने माझी आज्ञा प्रमाण मानली असती.  

  • स्यमंतक मण्याची कहाणी
    10 min 34 sec

    स्यमंतक मण्याची कहाणी जेव्हा भगवान श्रीकृष्णावर चोरीचा आरोप झाला होता श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे. एकदा साक्षात भगवान श्रीकृष्णालाही स्यमंतक मणी मिळवण्याची इच्छा झाली. बालपणी गोपिकांकडून लोणी चोरून खाणारा श्रीकृष्ण माखनचोर म्हणून ओळखला जाई. परंतु यावेळी भगवान श्रीकृष्णावर जो आरोप केला गेला तो गंमत म्हणून केलेल्या चोरीबद्दल नव्हता बरं का यावेळी त्याच्यावर जगातली सर्वात मौल्यवान वस्तू चोरल्याचा आरोप करण्यात आला. भगवान श्रीकृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आरोप केला गेला होता. या आरोपातलं सत्य काय होतं भगवान श्रीकृष्णाने खरोखरच त्या मौल्यवान मण्याची चोरी केली होती का जर नसेल तर मग त्याच्यावर असा आरोप का करण्यात आला श्रोतेहो या कथेत आज आपल्याला या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत. भगवान श्रीकृष्णाच्या पत्नी जांबवंती आणि सत्यभामा या दंतकथेशी संबंधित आहेत. तर मग अधिक वेळ न घालवता आपण ही रंजक कथा ऐकूया आणि त्यासंदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरंही जाणून घेऊया.अंधकवंशी यादवांचा राजा सत्रजीत हा भगवान सूर्यदेवांचा श्रेष्ठ भक्त होता. सत्रजिताने अनेक वर्षे सूर्यदेवांची उपासना केली. एके दिवशी सकाळी सत्रजीत नेहमीप्रमाणे सूर्यपूजा करत होता, त्या वेळी साक्षात भगवान सूर्यदेव सत्रजितासमोरच प्रकट झाले तेव्हा त्याने हात जोडून वंदन केलं आणि तो म्हणाला, “देवा, ज्या तेजानं आपण संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करता, कृपया ते तेज आपण मला द्यावं.” सत्राजिताची ही विनंती ऐकून त्याला भगवान भास्कर यांनी दिव्य असा स्यमंतक मणी दिला. हा मणी भगवान सूर्यांच्या तेजाने प्रकाशित झालेला होता. जेव्हा सत्रजितने स्यमंतक मणी आपल्या गळ्यात परिधान करून त्याच्या नगरात प्रवेश केला, तेव्हा जणूकाही स्वत: सूर्यदेवच आले आहेत असं सर्वांना वाटत होत‍ं. सत्रजितने हा मणी त्याच्या धाकट्या लाडक्या भावाकडे प्रसन्नजितकडे दिला. ह्या मण्याने अंधकवंशी यादवांच्या घरात समृद्धी आणली. स्यमंतक मणी ज्या ज्या भागात असायचा त्या त्या ठिकाणी आजूबाजूच्या भागात वेळेवर पाऊस पडत असे. लोक सर्व आजारांपासून मुक्त असत. भगवान श्रीकृष्णाला जेव्हा या स्यमंतक मण्याबद्दल समजलं, तेव्हा त्याने प्रसन्नजिताकडून हा मणी मिळवण्याची इच्छा व्यक्त केली, परंतु प्रसन्नजिताने श्रीकृष्णाला हा मणी द्यायला नकार दिला. 

  • नहूष: जन्म
    6 min 56 sec

    वैवस्वत मनूची पहिली मुलगी इला आणि चंद्रपुत्र बुध या दोघांचा पुत्र पुरूरवाने चंद्रवंशाची स्थापना केली आणि अनेक वर्ष धर्माने प्रजापालन केले. महाराज पुरुरवा आणि अप्सरा उर्वशीचा पुत्र आयूने त्यांच्या पश्चात चंद्रवंशाची धुरा सांभाळली आयू आपल्या पित्याप्रमाणेच राजधर्माचे पालन करणारा प्रतापी आणि प्रजावत्सल राजा होता. एवढं ऐश्वर्य आणि वैभव प्राप्त करूनही आयूचं मन मात्र नेहमीच नि:संतान असल्याच्या दुःखात बुडून गेलेलं असे. त्यांच्या पश्चात चंद्रवंशाच्या अस्तित्वाचं काय होईल या चिंतेत तो सदैव गुरफटून गेलेला असे. मनात एका उत्तराधिकार्‍याची कामना घेऊन राजा आयूने महाराणी प्रभा यांच्यासह भगवान दत्तात्रेयांना शरण जाण्याचा निर्णय घेतला. दोघांनी शंभर वर्ष भगवान दत्तात्र्येयांच्या आश्रमात राहून त्यांची सेवा केली. त्यांच्या सेवा आणि भक्तीने संतुष्ट होऊन त्रीदेवांचे अवतार भगवान दत्तात्रेयांनी त्यांना एका चक्रवर्ती पुत्राचं वरदान दिलं. अशा प्रकारे पुत्र प्राप्तीचे वरदान प्राप्त करून महाराज आयू आणि महाराणी प्रभा राजमहालात परतली आणि पुत्रजन्माची प्रतीक्षा करू लागली.  

  • Trailer
    1 min 6 sec

  • शेषनाग ची आणि आस्तिक मुनि ची गोष्ट
    8 min 16 sec

    गरुडाने आणलेला अमृत कलश नागांनी अमृत पिण्याआधीच इंद्र घेऊन गेला आणि नागांना अमृत मिळालंच नाही. आता ते आईच्या शापापासून आपला बचाव करण्यासाठी आणखी काही उपाय सुचतो का याचा विचार करू लागले. या नागांपैकी शेषनागाने त्याच्या भावांच्या वागण्याने त्रस्त होऊन त्यांच्यापासून स्वतंत्र आयुष्य जगण्याचं निश्चित केलं. त्याने ब्रम्हदेवाची उपासना करण्यासाठी वर्षानुवर्ष केवळ हवा पिऊन कठोर तपश्चर्या केली. शेवटी ब्रह्मदेव त्याच्या तपश्चर्येमुळे प्रसन्न झाला आणि त्याला दर्शन दिलं.ब्रह्मदेवाने शेषनागाला विचारलं, शेषा तुझ्या कठोर तपश्चर्येचं प्रयोजन काय आहे तू स्वतःला इतका त्रास का देतो आहेस शेषाने ब्रह्मदेवाला सांगितलं,भगवंता, माझे सर्व भाऊ अतिशय मूर्ख आहेत आणि नेहमीच एकमेकांशी भांडत असतात. विनता आणि तिचे पुत्र अरुण आणि गरुड यांच्याशी न बोलून मी वैर ओढवून घेतलं आहे. मला त्यांच्याबरोबर राहायचं नाही. मला माझ्या भावांपासून दूर राहाता यावं हेच माझ्या तपाचं हेच उद्दिष्ट आहे.

  • पारिजात हरण - भाग 1
    12 min 31 sec

    द्वारकेत आले नारद मुनीएकदा भगवान श्रीकृष्ण आपली पत्नी रुक्मिणी हिच्या समवेत रैवतक पर्वतावर गेले होते. तिथे देवी रुक्मिणीने एका समारोहाचं आयोजन केलं आणि भगवान श्रीकृष्ण स्वतः अतिथींचं स्वागत सत्कार करू लागले. भगवान श्रीकृष्णांना अतिथींच्या आदरातिथ्यात काही कमी पडू द्यायचं नव्हतं.या भव्य समारंभात त्यांच्या पट्टराण्या आणि राण्यांच्या दास्यासुद्धा सहभागी झाल्या होत्या. जेव्हा भगवान श्रीकृष्ण देवी रुक्मिणी सोबत बसले तेव्हा तिथे नारदमुनी आले. भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणीनं नारदांनाअभिवादन केलं आणि आपल्या जवळच्या स्थानावर बसवलं.

  • परिजात हरण - भाग 2
    15 min 25 sec

    द्वारकेतला पारिजात वृक्षकथेच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की नारदमुनींनी द्वारकेत आल्यावर एकामागोमाग एक अशा प्रकारे घटना घडवल्या, की ज्यामुळे भगवान श्रीकृष्णानी सत्यभामेला अमरावतीहून पारिजातकाचा वृक्ष आणून तिच्या बागेत लावण्याचं वचन दिलं. श्रीकृष्णाच्या परिजातहरण लीलेच्या या भागात आपण जाणून घेऊयाकी श्रीकृष्णांनी कसं आपल्या वचनाचं पालन केलं. भगवान श्रीकृष्णांचा निरोप घेऊन नारद मुनी महादेवाच्या सन्मानार्थ स्वर्गात आयोजित केलेल्या एका समारंभात गेले. तिथे इतर देव, गंधर्व, अप्सरा आणि देवर्षी यांच्याबरोबर नारदमुनी उमामहेश्वरांची आराधना करू लागले.

  • सत्यवतीचा विवाह
    9 min 30 sec

    एके दिवश महाराज शान्तनु गंगा नदीच्या काठी विहार करत होते अणि त्यांनी पाहिले की एक किशोर वयाच्या मुलाने आपल्या धनुर्विद्येने गंगेचा प्रवाह रोखून धरला होता. महाराज शान्तनु हे पाहून आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी त्याला त्याचा परिचय विचारला. त्याच वेळी देवी गंगेने तेथे प्रकट होऊनशान्तनु यांना त्या मुलाचा परिचय दिला. ती म्हणाली महाराज आज मी तुमचा पुत्र देवव्रत तुम्हाला सोपवते आहे. याने ब्रह्मर्षि वसिष्ठ यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांचे अध्ययन केलं आहे आणि धनुर्विदयेची कला स्वतः भगवान परशुरामांकडून मिळवली आहे.हा आपला पुत्र कुरुवंशाचा उत्तराधिकारी होण्यासाठी अगदी योग्य आहे.” असं म्हणून देवी गंगा पाण्यात विलीन झाली आणि महाराज शान्तनु यांनी आपल्या पुत्राला आपल्याबरोबर महालात आणलं. देवव्रत सर्व प्रकारच्या विद्यांमध्ये निपुण होता आणि महाराज शान्तनुना आपल्या पुत्राविषयी खूप अभिमान होता.

  • गणपतीचे हत्तीचे मस्तक
    4 min 41 sec

    गणेशपुराणात शौनक ऋषी सूतांना गणेशाचा गजानन कसा झाला याची कथा विचारतात. सूत मुनी त्यांना तीच कथा ऐकवतात जी नारायणाने नारद मुनींना ऐकवली होती.एकदा देवराज इंद्र पुष्पभद्रा नदीच्या शांत आणि सुंदर किनारी उभे होते. त्या निर्मनुष्य क्षेत्रात अनेक सुंदरफुले आणि झाडे लावलेली होती.

  • गोवर्धन पूजा | Govardhan Pooja
    12 min 5 sec

    एकदा कृष्ण आणि बलराम जंगलात काही वेळ मजेत घालवून पुन्हा ब्रिजकडे परतले. ब्रिजला पोहोचताच त्यांनी पहिलं की, इंद्रोत्सवाबद्दल सर्वच गोप खूप आनंदी आणि उत्साही आहेत. हे पाहून कृष्णाला कुतूहल वाटलं आणि त्याने विचारलं, हा सण का साजरा करतात श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून एक म्हातारा गोप म्हणाला, इंद्रदेव हा ढगांचा स्वामी आहे, तोच सर्व जगाचा रक्षणकर्ता आहे. त्यांच्या कृपेनेच पाऊस येतो. पावसामुळे आमची सगळी पिकं हिरवीगार राहतात, आपल्या गुरख्यांना गुरं चारण्यासाठी पुरेसं गवत मिळतं आणि इंद्रदेवाच्या कृपेने कधीही पाण्याची कमतरता भासत नाही, इंद्राच्या आज्ञेने ढग जमा होतात आणि बरसतात. कृष्णा पाऊस या पृथ्वीतलावर जीवन आणतो आणि देवराज इंद्र खुष राहिला की पाऊस पडतो. त्यामुळे इंद्रदेवाची वर्षा ऋतुत पूजा केली जाते. सगळेच राजे मोठ्या आनंदाने इंद्रदेवाची पूजा करतात, म्हणून आम्हीही सर्वजण तेच करत आहोत .    श्रीकृष्णाने गोपांचं बोलणं फार काळजीपूर्वक ऐकलं आणि मग त्याने म्हंटलं, आर्य आपण सर्व जण जंगलात राहणारे गोपाळ आहोत आणि आपली उपजीविका गोधनावर अवलंबून आहे म्हणूनच गायी, जंगलं आणि पर्वत हे आपले देव असले पाहिजेत. शेतकऱ्याची उपजीविका शेती आहे, त्याचप्रमाणे आपल्या उपजीविकेचे साधन गायींचं संगोपन करणं हे आहे. जंगलं आपल्याला सर्वकाही प्रदान करतात आणि पर्वत आपलं संरक्षण करतात. आपण या सर्वांवर अवलंबून आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की आपण गिरियाचना करायला हवी. आपण झाडांजवळ किंवा डोंगराजवळ सर्व गायी एकत्र आणल्या पाहिजेत, त्यांची पूजा केली पाहिजे आणि एखाद्या शुभ मंदिरात सर्व दूध गोळा केलं पाहिजे. गायींना मोरपंखांच्या मुकुटाने सुशोभित केलं पाहिजे आणि नंतर फुलांनी त्यांची पूजा केली पाहिजे. देवांना इंद्राची पूजा करु द्यावी आणि आपण मात्र गिरीराज गोवर्धनची पूजा करू.   

  • चित्रकेतू वृत्रासूर बनला त्याची कथा.
    16 min 52 sec

    ज्यांना दधीची ऋषीची कथा माहीत आहे त्यांना हेही माहीत असेलच की कशाप्रकारे असुर वृत्र कोणत्याही धातूच्या बनलेल्या अस्त्रापासून अवध्य होता आणि त्याचा संहार करण्यासाठी दधीची ऋषींनी आपल्या प्राणांचा त्याग करून आपल्या अस्थी देवराज इंद्राला दान केल्या होत्या. त्याच वृत्रासुराच्या पूर्वजन्माची ही कथा.  शूरसेन देशात चित्रकेतू नावाचा एक राजा होता. ज्याने पूर्ण पृथ्वीवर विजय प्राप्त केला. राजाची शक्ती इतकी होती की त्याच्या राज्यात राहणार्‍या सर्वांसाठीच्या खाण्याच्या वस्तू आपोआप उत्पन्न होत असत. राज्यात सुखसमृद्धी अशी होती, की प्रजा राजाला दूसरा ईश्वर मान त असे. धनदौलत, ऐश्वर्य, चित्रकेतूला कशाचीही कमी नव्हती. आपल्या पराक्रम आणि शौर्याने त्याने अनेक सुंदर स्त्रियांचं हृदयही जिंकलं होतं. चित्रकेतूच्या एक कोटी राण्या होत्या. परंतू एवढं ऐश्वर्य असूनही तो निःसंतान होत. त्यामुळेच तो नेहमी चिंतेत असे. एक दिवस तिन्ही लोकी भ्रमण करण्यासाठी निघलेल्या प्रजापती अंगिरा ऋषीनी चित्रकेतूच्या महाली त्याचं आतिथ्य स्वीकारलं. राजकडे सर्वकाही असूनही त्याचा उदास चेहरा पाहून ब्रह्मर्षीनी याचं कारण विचारलं, चित्रकेतू म्हणाला, हे भगवान, समग्र सृष्टीतील सगळी सुगंधित फुलं मिळूनही एखाद्या भुकेलेल्या माणसाची भूक शमवू शकत नाहीत, त्याच प्रकारे हे सारं ऐश्वर्य मिळून एका निपुत्रिक पित्याचे दुःख दूर करू शकत नाही. भुकेलेल्याला जशी अन्नाची आवश्यकता असते त्याच प्रकारे, हे भगवान मला एक पुत्र प्रदान करून माझी ही पीडा दूर करा.  त्रिकालदर्शी अंगिरा ऋषींना हे चांगलंच ठाऊक होतं की चित्रकेतूच्या भाग्यात संतान सुख नाहीए. पण त्याच्या हट्टापुढे ब्रह्मर्षीही हतबल झाले. म्हणून एका यज्ञाचं आयोजन करून त्यातून उत्पन्न झालेलं चरू त्यांनी राजाची पट्टराणी कृतद्युतीला दिलं. यथावकाश कृतद्युतीने एका अत्यंत सुंदर पुत्राला जन्म दिला. एक करोड राण्या असूनही निःसंतान असलेल्या चित्रकेतूसाठी पहिल्या मुलाचं सुख स्वर्गावर विजय मिळवण्याच्या आनंदापेक्षाही अधिक आनंददायी होतं. राजकुमाराच्या येण्याने संपूर्ण राज्यात जणू उत्सवाचा माहोल बनला होता. परंतू हा आनंद फार काळ टिकणार नव्हता. राणी कृतद्युतीने राजकुमाराला जन्म दिला होता, त्यामुळे राजाचं सारं लक्ष आपल्या पट्टराणीतच गुंतून राहू लागलं. ते पाहून इतर राण्यांच्या मनात इर्षेची भावना निर्माण झाली. त्यांचा द्वेष इतका वाढला की राजाने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा दोष नवजात बालकाला त्या देऊ लागल्या. त्याच्या मनातील घृणा इतकी वाढली की एके दिवशी रागाच्या भरात त्यांनी छोट्या राजकुमाराला विष दिलं. कृतद्युतीला ही गोष्ट कळेपर्यंत फार उशीर झाला होता. राजकुमारच्या प्राणांनी त्याच्या नश्वर शरीराचा त्याग केला होता. 

  • राजा मांधाता (King Mandhata)
    9 min 41 sec

    मांधाता हा यूवनश्विन नावानेही ओळखला जातो. याचा अर्थ आ हे, युवनावश्वचा पुत्र जे एक महान राजा होते. ज्यांची प्रशंसा महाभारतात देखील केलेली आहे. मांधाताची जन्म कहाणी कोणत्या चमत्कारापेक्षा कमी नाही.  सूर्यवंशामध्ये युवनावश्व नावाचा एक राजा होता. त्यांचे राज्य समृध्द होते. सेना मजबूत होती. एवढंच नाही तर त्यांची प्रजाही त्यांच्यावर खूष होती. तसेच त्यांनी त्यांच्या आयुष्यात शेकडो अश्वमेध यज्ञ केले होते. एवढं ऐश्वर्य, यश असूनसुद्धा राजाला एकच चिंता सतावत होती, की राजाला पुत्र नव्हता.  

  • उर्वशी आणि पुरुरवा
    11 min 45 sec

    इला आणि बुध यांच्या पोटी जो पुत्र जन्माला आला त्याचं नाव पुरुरवा होतं. पुरुरावा ने आपले पिता चंद्र यांच्या नावे चंद्र वंशाची स्थापना केली. आणि इलाच्या पश्चात ते राजा बनले. पुरूरव्यामध्ये देवसुलभ गुण होते आणि ते प्रचंड बलशाली आणि प्रतापी राजा होते. पुरुरवानी शंभर अश्वमेध यज्ञ करून स्वतःला देवांप्रमाणे यशोबल धारी बनवले होते. तिन्ही लोकांत पुरूरावाच्या शौर्यगाथा गायल्या जाऊ लागल्या. त्यामुळे प्रभावित होऊन देवांचा राजा इंद्रानेही पूरुरवा बरोबर मैत्री केली आणि असुरांविरुद्धच्या लढाईत अनेकवेळा त्यांचं समर्थन मिळवलं 

  • महाराज परीक्षित
    9 min 29 sec

    पांडवांच्या महाप्रयाणानंतर अर्जुनाचा नातू आणि अभिमन्यूचा मुलगा परिक्षीत हस्तीनापुरचा राजा बनला. प्रत्यक्षात पांडव भावांकडून विद्या प्राप्त केलेले परिक्षीत सर्वगुण संपन्न महाप्रतापी राजा होते. परिक्षीत गुरू कृपाचार्य आणि युयुत्सू दोघांच्या निगराणी खाली उत्तम प्रकारे राजधर्माचे पालन करत होते. परिक्षीतांचा विवाह उत्तर राजाची कन्या इरावती सोबत झाला. आणि त्यांना जनमेजय, भीमसेन, श्रुतसेन आणि उग्रसेन नावाचे चार पुत्र झाले.  

  • च्यवन ऋषि
    8 min 37 sec

    च्यवन ऋषि 

  • सोनेरी मुंगूस
    7 min 15 sec

    कुरुक्षेत्राचं युद्ध जिंकल्यानंतर, युधिष्ठिर हस्तिनापुरीचा राजा झाला आणि त्याने अश्वमेध यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. यज्ञ अत्यंत संस्मर्णीय आणि व्यापक स्वरूपाचा झाला ज्याची किर्ति चारी दिशांना पसरली. यज्ञ वैदिक अनुष्ठाना नुसार विद्वान ब्राम्हणांच्या मार्गदर्शनात पार पडला आणि दानधर्मही त्याच तोडीने केला गेला जसा आजवर विश्वात कुणीही पहिला नसेल.यज्ञाच्या शेवटी एक मुंगूस तिथे आले. ज्याच्या शरीराचा अर्धा भाग सोनेरी होता आणि अर्धा तपकिरी रंगाचा होता. मुंगूस तिथे येताच जमिनीवर पसरले आणि जोरजोरात आवाज करू लागले.त्याने तिथे असलेल्या सगळ्या ब्राम्हणांचे लक्ष आपल्याकडे खेचले आणि त्यासोबतच त्याने माणसाच्या आवाजात बोलायला सुरुवात केली. मुंगूस म्हणाले, धर्मराज हे दिलेलं दान एका गरीब ब्राम्हणाकडून दिल्या गेलेल्या एक किलो पिठाच्या तुलनेत काहीच नाहीये.

  • स्यमंतक मण्याची कहाणी
    10 min 34 sec

    श्रोतेहो, सूत्रधार मध्ये आज आपण स्यमंतक मण्याबद्दलची कथा ऐकूया. स्यमंतक मणि हे असं एक रत्न होतं. ज्यामध्ये स्वतः भगवान सूर्यदेव यांचं तेज समाविष्ट झालेलं होतं. हा मणी ज्या राज्यात असेल ते राज्य धनधान्याने समृद्ध असे. हा मणी आपल्याचजवळ असावा असं प्रत्येकाला वाटे. एकदा साक्षात भगवान श्रीकृष्णालाही स्यमंतक मणी मिळवण्याची इच्छा झाली. बालपणी गोपिकांकडूनलोणी चोरून खाणारा श्रीकृष्ण माखनचोर म्हणून ओळखला जाई. परंतु यावेळी भगवान श्रीकृष्णावर जोआरोप केला गेला तो गंमत म्हणून केलेल्या चोरीबद्दल नव्हता बरं का

  • अजगरोपाख्यान - नहुष उद्धार
    14 min 18 sec

    आपल्या अहंकारामुळे अगस्त्य ऋषींच्या शापाचा धनी झालेल्या नहूषाने पृथ्वीवर अनेक वर्षे एका अजगराच्या रुपात काढली. शेवटी नहुषाचा उद्धार कसा झाला हे आपण नहुषाच्या गोष्टीच्या या भागात   पाहू.   एकेकाळी इंद्र असलेल्या नहुषाचे पृथ्वीवर एका सापाच्या रुपात अधःपतन झाल्याला हजारो वर्षे लोटली होती.   महर्षि अगस्त्य यांच्या शापामुळे इतक्या वर्षांच्या काळानंतरही नहुषाला हे सगळं व्यवस्थित लक्षात होतं. त्याला हे माहित होतं की तो चंद्रवंशी सम्राट आयु यांचा पुत्र आहे, तसेच मिळालेले इंद्रपद स्वतःच्या अहंकारामुळे  गमावणारा एक  अभागी पुरुषदेखील आहे. सर्परूपी स्वतःची चूक सदैव आठवत आणि त्याबद्दल पश्चात्ताप करत असे, आणि मुक्तीची वाट पहात बसे. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या सरस्वती नदी किनारी सर्परुपात राहणारा नहुष जीवजंतू आणि जवळ आलेल्या माणसांना खाऊन आपली भूक भागवत असे. अशा रीतीने आयुष्य घालवत असताना आता नहुष द्वापार युगात येऊन पोचला होता.  वनवासकाळात पांडव फिरत फिरत याच वनात आले जेथे नहुष रहात होता. एकदा अन्नाच्या शोधात भीम चुकून नहुषच्या जवळ गेला. बऱ्याच दिवसांपासून उपाशी असलेल्या नहुषाने भीमाला बघून त्याला खायचा निश्चय केला.  सर्परूपी नहुषच्या विशाल आकाराने चकित झालेला भीम क्षणभर जागीच थांबला. जिभल्या चाटत नहुष पुढे झाला. आपल्या बळाचा कायम गर्व असलेल्या भीमाला आज एक साप पकडू पाहत होता आणि सुटण्याची खूप धडपड करुनही भीमाला त्याच्या तावडीतून सुटता येईना.  भीमाला नहुष खाऊन टाकणार इतक्यात तेथे धर्मराज युधिष्ठीर आला. भीम इतका वेळ का परतला नाही या चिंतेत युधिष्ठीर त्याला शोधत तेथे आला होता.  आपल्या महाबलशाली भावाला एका सापाच्या तावडीत सापडलेला पाहुन युधिष्ठिराच्या ये लक्षात आलं की हा कुणी साधासुधा साप असणे शक्य नाही.  “हे सर्पा, मी युधिष्ठीर आहे. तू ज्याला खायला निघाला आहेस तो माझा धाकटा भाऊ आहे. कृपा करून तू त्याला सोड. मी त्याच्या बदल्यात तुला दुसरं उत्कृष्ट अन्न द्यायचं वचन देतो.” भीमाला वाचवण्यासाठी युधिष्ठिराने सापाला सांगितले.  “हे कुंती पुत्रा, तू कोण आहेस हा मला चांगले माहित आहे, आणि तुझ्या भावालाही मी ओळखतो. पण भुकेच्या आगीमुळे माझा नाईलाज झाला आहे. खूप दिवसांपासून उपाशी असल्यामुळे भीमासारखा धष्टपुष्ट माणूस खाऊनच  मी माझा जीव वाचवू शकतो. तू परत जा. आज मी भीमाला खाणार हे नक्की ” भुकेने कासावीस झालेला नहुष म्हणाला.  “थोडा थांब सर्पश्रेष्ठा, तू नक्कीच कुणीतरी वेगळा आहेस. कुणीतरी देवता, दैत्य किंवा गंधर्व नक्कीच तुझ्याकडे एक अलौकिक शक्ती आहे. त्याशिवाय हजार हत्तीचे बळ असणाऱ्या भीमाला असं पराजित करणं हे कुणा साध्यासुध्या सापाला जमणं शक्य नाही. कृपा करून आपली ओळख सांगा ” असे म्हणून युधिष्ठिराने यह कह कर नहुषाची ओळख करून घ्यायचा प्रयत्न केला.   “उत्तम हे कुंतीपुत्रा, मला माहित होतं की तू मला नक्कीच ओळखशील. मी तुझे पूर्वज चंद्रवंशी राजे आयु यांचां पुत्र नहुष आहे. माझ्याच एका चुकीमुळे एकेकाळी इंद्रासनावर बसणारा हा नहुष अगस्त्य ऋषींच्या शापाचा धनी झाला आणि आज सर्प योनीत जगत आहे. पण त्या शापावर अगस्त्य ऋषींनी मला हे वरदानही दिले होते की जो माझ्या जवळ येईल त्याची शक्ती मला पाहताच क्षीण होईल आणि मी त्याला सहज खाऊ शकेन” अशा रीतीने नहुषने आपला सगळा वृतांत धर्मराजाला सांगितला. “हे आयुपुत्रा माझा प्रणाम स्वीकार कर तुला भेटून मला खूप आनंद झाला आहे. चंद्रवंशाच्या सुरुवातीच्या काळात जे  महान शासक होऊन गेले त्यांच्याविषयी मी फक्त ऐकले होते. आज तुम्हाला भेटायचे सद्भाग्य मला लाभले. पण हे नहुष तू फक्त आमचा पूर्वजच नव्हेस तर आमचा रक्ताचा नातेवाईकही आहेस. आमच्याही अंगात चंद्रवंशाचे रक्त वाहत आहे. त्यामुळे तुझ्याच वंशाच्या भीमाला तू खाणे हे अयोग्य आहे आयुपुत्रा”  आपल्या शास्त्रज्ञानाचा उपयोग करत युधिष्ठिरानेने नहुषला सांगितले.आतापर्यंत नहुषदेखील धर्मराजाच्या ज्ञानाने आणि चतुराईने प्रभावित झाला होता. तो युधिष्ठिराला म्हणाला “ ठीक आहे पांडुपुत्रा, तू असं म्हणतोस तर मी तुझ्या धाकट्या भावाचे प्राण वाचवण्याची एक संधी तुला अवश्य देईन. जर तू माझ्या प्रश्नांची अचूक उत्तरे दिलीस तर मी भीमाला सोडून देईन. नाहीतर तू माझ्या आणि माझ्या अन्नाच्या मध्ये येऊ नयेस” युधिष्ठिराला सर्परूपी नहुषाने अट घातली.      “ठीक आहे आयुपुत्रा विचार जे विचारायचे आहे ते. मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे ” युधिष्ठिर म्हणाला.  “राजा युधिष्ठिरा मला सांग की ब्राह्मण म्हणजे कोण आणि त्याला कसे ओळखावे”  नहुषने प्रश्न विचारला.“सर्पराज ज्याच्यात सत्य, दान, क्षमा, सुशीलता, क्रूरतेचा अभाव, तपस्या आणि दया हे सद्गुण दिसतात त्याला ब्राह्मण म्हटले आहे. जाणण्यायोग्य तत्व तर परब्रम्हच आहे जे दुःख आणि सुखांपासून दूर आहे, आणि जिथे पोचल्यावर, किंवा जे जाणल्यावर मनुष्य सगळ्या शोकांपासून मुक्त होतो” युधिष्ठिराने ने ब्राह्मणाची व्याख्या सांगितली. “पण हे सगळे गुण तर शुद्रांमध्येही असू शकतात” नहुषने पुन्हा प्रश्न विचारला.“अवश्य...जर शुद्रात सत्य आणि धर्मनिष्ठा इत्यादी उपयुक्त लक्षणे असतील तर तो शुद्र नव्हे तर ब्राह्मण मानला जातो, आणि ज्या मनुष्यात ही लक्षणे नसतील त्याला शूद्रच म्हणायला हवे” युधिष्ठिराने उत्तर दिले,“हे, धर्मराज, जर एखाद्या व्यक्तीची जात फक्त त्याच्या कर्मावरच ठरत असल तर जन्मानुसार जाती ठरवल्या जाणे कितपत योग्य आहे” नहुष युधिष्ठिराच्या उत्तरांनी जणू संतुष्टच होत नव्हता.  “हे सर्पराज, या विषयावर स्वयंभू मनु यांनी सविस्तर भाष्य केले आहे, की ज्या बालकाच्या जन्मानंतर त्याला वेदांचे ज्ञान दिले जात नाही ते कुठल्याही जातीत जन्माला आले तरी ते शूद्रच म्हणायला हवे.  त्यामुळे असा नियम आहे की पित्याला आचार्य होऊन व मातेला सावित्री होऊन आपल्या नवजात बाळाला वेदांचे ज्ञान देणे अत्यंत आवश्यक आहे. इतकेच नव्हे सर्पराज, तर स्वयंभू मनु यांनी पुढे म्हटले आहे की मिश्र जातींच्या विवाहसंबंधांमधून जन्माला आलेल्या बालकांच्या जातीची ओळखल तोपर्यंत पटणे अशक्य आहे जोपर्यंत ती त्यांच्या जातीला साजेसे गुण दाखवायला लागत नाहीत. हे नहुष, धर्माचे अचूल आचरण करून व सत्याच्या मार्गाचा स्वीकार करून कुठलाही शुद्र ब्राह्मण होऊ शकतो आणि यांचे पालन न करणारा, पण ब्राह्मण म्हणून जन्माला आलेला  कुणीही शुद्र होऊ शकतो ” युधिष्ठिराने नहुषला जातीची व्याख्या सांगितली.  वेदज्ञ नहुषाबरोबर ज्ञानाची चर्चा करताना युधिष्ठिरानेही त्याला धर्मासंबंधी अनेक प्रश्न विचारले.  सगळ्यात पहिला प्रश्न असा होता, की मनुष्याला मोक्षप्राप्ती कशी होऊ शकते याला उत्तर देताना नहुष म्हणाला “हे भरतवंशी, जो मनुष्य उचित दान धर्म करतो , सदैव गोड आणि सत्य बोलतो, तसेच कुठल्याही प्राण्याला कुठल्याही प्रकारे त्रास देत नाही, त्याला मोक्ष मिळणे निश्चित आहे”  “हे सर्पश्रेष्ठा, कृपा करून हे सांगा की दान आणि सत्य बोलणे यातील उत्कृष्ट धर्म कोणता  शिवाय   सदाचार आणि कुठल्याही प्राण्याला इजा न करणे यात कुठल्या प्रकारचे आचरण निवडायला हवे” या विषयात आणखी माहिती मिळवण्यात युधिष्ठिराला रस होता.  “हे कुंतीकुमारा, हे सगळेच गुण एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेत. परिस्थितिनुसार आणि आवश्यकतेनुसार यांचे स्वरूप ठरते. याशिवाय हेही लक्षात ठेव राजा, की जिथे गोड पण असत्य बोलावे लागेल तेथे सदाचार बाजूला ठेवून सत्याला प्राधान्य द्यायला हवे. तसेच कुठल्याही प्राण्याच्या जीवाचे मोल हे कुठल्याही दानधर्मापेक्षा जास्त आहे. जर कुणाला इजा न करणे आणि दानधर्म किंवा सदाचार करणे यात निवड करायची असेल तेथे नेहेमीच कुणाला इजा न करण्याला प्राधान्य देणे हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे”  नहुषने मोक्षप्राप्तिचा मार्ग दाखवताना युधिष्ठिराला सांगितले. यानंतर स्वर्गप्राप्तिविषयी अधिक जाणून घेण्यासाठी युधिष्ठिराने नहुषला जन्ममृत्युच्या चक्राविषयी विचारले. त्यावर उत्तर देताना नहुष म्हणाला “ हे युधिष्ठिरा, मी आधीच सांगितल्याप्रमाणे जो मानुष सदाचारी असेल, धर्माचरण करणारा असेल, आणि कुणाला इजा न करणारा असेल त्याला मोक्ष प्राप्ती होते. याच्या उलट आचरण करणारा मनुष्य,  जो सदैव लोभ, क्रोध व कामवासनेने ग्रासलेला असेल , त्याला वारंवार मनुष्य किंवा इतर खालील स्तरावरच्या योनींमध्ये जन्म घेऊन संसारिक कष्ट भोगावे लागतात.  सगळ्याच प्राण्यांमध्ये परमचेतनेच्या रुपात “आत्म्या”चा वास असतो.  हा आत्मा भौतिक सुखांच्या प्राप्तीसाठी इंद्रियांचा उपयोग करत राहतो. म्हणूनच हे कुंतीकुमारा,  इंद्रियांवर संयम ठेवणे हा आत्म्याच्या मुक्तीचा एकमेव मार्ग आहे” “अति उत्तम। हे सर्परूपी नहुषा, मी तुझ्या ज्ञानाने अत्यंत प्रसन्न झालो आहे.  कृपा करून मला आता हे सांगा की तुझ्यासारखा गुणी धर्मात्मा राजर्षीदेखील हे सगळे ज्ञान असताना आपल्या इंद्रियांवरचा ताबा कसा गमावून बसला, आणि अशा रीतीने शापित झाला” युधिष्ठिराने विचारले.  “हे धर्मराज, हेच तर नामुष्याचे सर्वात मोठे दुर्भाग्य आहे, की सगळे माहित असूनही त्याला हे सत्य माहित नाही.  समृद्धि आणि श्रीमंतीच्या झगमगाटाने मोठे मोठे विद्वानही आंधळे होऊन जातात.  इन्द्रपदाच्या अहंकाराने मीही असाच मूर्खासारखा वागलो. पण तुला धन्यवाद कारण तू इथे येऊन माझ्याशी या ज्ञानाविषयी चर्चा केलीस. अगस्त्य ऋषींनी सांगितल्याप्रमे तुझ्याशी धर्मसंवाद केल्यामुळेच मला पुन्हा स्वर्गलोकात परतणे शक्य होते. तू आता माझ्या मुक्तीचा मार्ग मोकळा केलं आहेस, युधिष्ठिरा” नहुष म्हणाला.  असे म्हणून सर्परूपी नहुषने भीमाला सोडून दिले. त्याच क्षणी ऋषी अगस्त्यांनी नहुषला दिलेल्या शापाचा अंत झाला. आपल्या मूळ स्वरुपात आल्यावर नहुषाने युधिष्ठिर आणि भीमाला आशीर्वाद दिले आणि आपले नश्वर शरीर त्यागून त्याने स्वर्गलोकाच्या दिशेने प्रस्थान केले.   

  • सूर्यदेव चा सारथी - अरुण
    5 min 46 sec

    सूर्यदेव चा सारथी अरुण सत्ययुगाच्या प्रारंभात ब्रह्मदेवच्या आशीर्वादाने दक्ष प्रजापतिच्या तेरा मुलींचा विवाह प्रजापति मरीचिचा पुत्र ऋषि कश्यप यांच्याशी झाला. कश्यप ऋषि आणि त्यांच्या पत्नींपासून विश्वात अनेक प्रजाती आणि वनस्पतींची उत्पत्ति झाली. हा प्रसंग त्यांच्यातीलच दोन पत्नी कद्रू आणि विनता यांच्याशी निगडीत आहे. कद्रू च्या गर्भातून नाग तसच विनताच्या गर्भातून पक्षीराज गरुड़ आणि सूर्यदेवाचा सारथी अरुण यांचा जन्म झाला. काय आहे ह्यांच्या जन्माची कथा का असतं गरुड आणि नागचं वैर या प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्यासाठी ऐका कद्रू आणि विनताची ही कथा. कश्यप ऋषींनी एके दिवशी आपल्या पत्नींना त्यांच्या इच्छेनुसार वर मागायला संगितले. कद्रू ने एक हज़ार तेजस्वी पुत्रांची कामना केली. विनता म्हणाली,मला कद्रूच्या एक हजार पुत्रांपेक्षाही तेजस्वी असे दोन पुत्र व्हावेत. कश्यप ऋषी, त्यांना इच्छापूर्तीचा वर देऊन आपल्या तपश्चर्येत मग्नत झाले.

  • भगवान जगन्नाथ : श्रीकृष्णाचे वैकुंठ गमन (Part 1)
    6 min 35 sec

    पहिला भाग : श्रीकृष्णाचे वैकुंठ गमनद्वापार युगाचा अंत जवळ येऊन ठेपला होता. ‘महाभारत’ युद्ध होऊन छत्तीस वर्ष झाली होती. गांधारीच्या शापानुसार, सात्यकी आणि कृतवर्मांच्या युद्धाने सुरू झालेल्या मतभेदाने आता संपूर्ण यादव वंश संपवला होता. बलराम स्वगृही परतल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आता पूर्णपणे एकटे पडले  होते. आता त्यांनी  उर्वरित आयुष्य जंगलात घालवण्यास सुरवात केली. एके दिवशी वनवासी जारा शिकारीच्या शोधात जंगलात फिरत होता. जाराला झुडूपांमध्ये एक हरिण  असल्याचं लक्षात आलं, त्याने धनुष्य व्यवस्थित तयार ठेवलं आणि हरणावर बाण सोडला. जाराचं लक्ष्य अभेद्य होतं. गडद लाल रक्ताचा प्रवाह पाहताच जाराला तो विजयी झाल्याचं समजलं. मग त्याला हृदय पिळवटून टाकणाऱ्या आर्त आक्रोशाने  काही काळ हादरवून टाकलं, त्याचा बाण हरिणाला न लागता चुकून माणसाला लागला होता. जारा समोरचं दृश्य पाहून स्वत:वरच खूप रागावला आणि पश्चात्तापदग्ध झाला  कारण हरीण आहे असं समजून त्याने मारलेला बाण झुडुपामध्ये विश्रांती घेणाऱ्या एका माणसाच्या पायामध्ये घुसला होता. तो मनुष्य म्हणजे दुसरातिसरा कोणी नसून साक्षात द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण होते. त्या परिस्थितीत भेदरलेल्या जारानं आपल्या पापाची शिक्षा म्हणून स्वत:च्याही  मृत्यूसाठी देवाकडे प्रार्थना केली.स्वतःच्या नशिबाला दोष देत रडणाऱ्या जाराला पाहून भगवान श्रीकृष्ण जरासे हसले. ज्यांनी अधर्माचा अंत करण्यासाठी महाभारताची रचना केली, त्यांना स्वतःच्या पूर्वनिर्धारित मृत्यूची पद्धत कशी माहित नसेल द्वापार युगात जारा हा भगवान श्रीकृष्णांच्या हत्येचं कारण ठरणार नाही तर त्यांच्या पार्थिव शरीराचा मुक्तीदाताच ठरणार  आहे.  हे सर्व पूर्वनिर्धारित होतं, असं सांगून शोकाकूल जाराचं भगवान श्रीकृष्णांनी सांत्वन केलं.श्रीकृष्णांनी जाराची उत्सुकता पाहून त्याला त्याच्या आणि स्वतःच्या पूर्व  जन्माची कथा सांगितली की ज्यामध्ये जाराच्याच हातून त्यांचा मृत्यू होणार हे विधिलिखित होतं. त्यांच्या पूर्वजन्मी म्हणजेच त्रेता युगात, भगवान श्रीरामांच्या  अवताराने शक्तिशाली वानरराजा वालीचा वध केला होता. जरी हे कृत्य धर्म स्थापनेसाठी आवश्यक होतं, तरी ते युद्धाच्या नियमांच्या विरुद्ध होतं.  भगवान श्रीरामांनी  वालीचा वध करण्यासाठी कपटाचा आश्रय घेतला आणि झुडपांमध्ये लपून वालीवर बाण चालवला. भगवान श्रीकृष्णांकडून ही कथा ऐकताना जाराला हे समजत नव्हतं की  त्याच्याशी या कथेचा काय सबंध असेल. मात्र जेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं की त्रेता युगात तोच वानर राजा वाली होते, तेव्हा त्याची शंका दूर झाली. तोच वाली हा देवराज इंद्राचा पुत्र होता ज्याच्या पराक्रमामुळे राक्षसच नाही तर  देवताही भीतीने थरथर कापत असत.जाराला हे सगळं एक अविश्वसनीय स्वप्नच वाटत होतं. परंतु त्यालाही त्यावर विश्वास ठेवणं भाग होतं. भगवान श्रीकृष्णावर बाण मारून त्याने त्याचा प्रतिशोध घेतला होता. रामाप्रती खरी भक्ती, प्रेम आणि समर्पण यांमुळे स्वत: भगवंतांनी त्याला ही संधी दिली. जारारूपातल्या वालीनं स्वतःच्याही नकळत, अशा रितीनं स्वतःच्या हत्येचा प्रतिशोध घेतला होता. त्या मनस्थितीत जारानं अर्जुनासमवेत भगवान श्रीकृष्णाचे अंत्तीम संस्कार केले आणि त्यांच्या म्हणण्यानुसार, द्वारका शहराचा विनाश स्वत:च्या डोळ्यांनी पाहिला. श्रीकृष्णांच्या शरीरावर अग्नीसंस्कार झाल्यावरही  त्यांचं  हृदय जसंच्या तसं राहिलं. अग्नी त्याला जाळू शकला नाही आणि ते अजूनही धडधडत होतं.  श्रीकृष्णाच्या या उर्वरित अंशाचं अर्जुन आणि जारानं समुद्रात विसर्जन केलं. त्याच क्षणी द्वापार युग संपलं आणि कलियुग सुरू झालं. आणखी एका समजुतीनुसार जारा हा वानर राजा वाली नव्हता तर त्याचा पुत्र अंगदाचा पुनर्जन्म होता.

  • नीलमाधव जगन्नाथ झाले - Part 4
    10 min 37 sec

    नीलकंदरहून परत आल्यावर बरेच दिवस झाले होते. सबर नगरीतविश्वावसू आणि अवंती नगरीत राजा इंद्रद्युम्न पुन्हा त्यांच्या आराध्य दैवताचंदर्शन घेण्यासाठी आतुर झाले होते. एका रात्री भगवान नीलमाधव इंद्रद्युम्नाच्यास्वप्नात आले. प्रथमच आपल्या परमेश्वराची निळी मूर्ती आणि अलौकिक तेजपाहून राजासुद्धा भक्तीभावाने न्हाऊन निघाला.नीलमाधव यांनी आता राजाला योग्य वेळ आल्याची सूचना दिली. तेम्हणाले, “माझ्या श्रेष्ठ भक्त इंद्रद्युम्ना, तू परत उत्कलच्या राज्यात जा. तेथेसमुद्राच्या किनाऱ्यावर पाण्यामध्ये तरंगणारा एक लाकडी ओंडका सापडेल.त्यापासून माझी, माझा बंधू बलरामाची आणि भगिनी सुभद्रा अशा त्रीमूर्तीकरवून घे. त्याच समुद्राच्या काठावर एक भव्य मंदिराची निर्मिती कर. तिथेविधिवत पूजा कर. कलियुगाचा अंत आणि कल्की अवतार संपेपर्यंत हा निळासमुद्रकिनारा ‘निलांचल’ हेच माझं स्थान असेल. तुला हे कार्य माझा आद्यसेवक विश्वावसू याच्या मदतीने पूर्णत्वाला न्यावं लागेल.

  • इंद्रद्युम्नाची ब्रह्मलोक यात्रा आणि मंदिर प्रतिष्ठापना - Part 4
    15 min 20 sec

    श्रीकृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्या मूर्तींची निर्मिती आणि मंदिराचंबांधकाम पूर्ण झालं. आता फक्त त्यांची प्रतिष्ठापना करायची राहिली होती. पणयातही अडथळा निर्माण झाला, ज्या भगवान जगन्नाथांची मूर्ती जी कोणत्याहीमनुष्याला निर्माण करणं अशक्य होतं, तिची प्रतिष्ठापना सामान्य ब्राह्मण कसाकरू शकेल यासाठी कदाचित देवर्षी नारद किंवा देवगुरू बृहस्पती यांच्यासारख्यादैवी ऋषींची आवश्यकता होती.राजा इंद्रद्युम्न तपश्चर्येला बसला. थोड्या वेळाने, जेव्हा कोणीतरी हाकमारली तेव्हा राजाने ध्यान सोडलं. त्याच्यासमोर साक्षात देवर्षी नारद उभेहोते. त्याने देवर्षी नारदांना वंदन केलं. राजाने त्यांच्याकडे मंदिर आणि मूर्तींच्यास्थापनेविषयी मार्गदर्शन करण्याची विनंती केली.देवर्षी नारद राजाला म्हणाले, quotनारायण, नारायण राजन, तू म्हणतोस तेबरोबर आहे. जे रूप मूर्तींमध्ये साकारण्यासाठी देवशिल्पी विश्वकर्माला यावंलागलं, त्या मूर्तींची प्रतिष्ठापना केवळ तोच करू शकतो जो त्रैलोक्यातीलसर्वश्रेष्ठ वेदज्ञ आहे.राजाने पुन्हा विचारलं, quotक्षमा करा देवर्षी, पण तुम्ही आणि देवगुरु बृहस्पतीव्यतिरिक्त असा कोण पारंगत विद्वान आणि उत्कृष्ट ब्राह्मण आहे जो हेकार्य तडीस नेईल”quotहे राजन, मी त्यांच्या विषयी बोलतो आहे, ज्यांच्या मुखातून समस्तवेदांची उत्पत्ती झाली आहे ते माझे पिता ब्रह्मदेवांच्याच हस्ते भगवान श्रीहरींचं हेकार्य संपन्न होईल.quotइंद्रद्युम्न आनंदाने म्हणाला, “ हे तर माझं भाग्यचदेवर्षी तुमची आज्ञाअसेल तर मी लगेच आपल्याबरोबर ब्रह्मलोकात येऊन प्रजापिता ब्रह्मदेवांनाआमंत्रण देऊ इच्छितो.quotquotअवश्य राजन, तू जरूर ये.quot देवर्षी त्याला आपल्यासह सदेह ब्रह्मलोकात घेऊनजाण्यास तयार झाले.”इंद्रद्युम्नाने विद्यापति, विश्वावसू आणि राणी गुंडीचा यांना निरोप दिलाआणि लवकरच परत येण्याचं वचन देऊन देवर्षी नारादांसह ब्रह्मलोकाकडे प्रयाणकेलं. जेव्हा ते ब्रह्मलोकात पोहोचले, तेव्हा ब्रह्मदेव ध्यानमग्न होते. राजाइंद्रद्युम्न त्यांचे ध्यान संपेपर्यंत वाट पाहत तिथेच थांबला.काही काळानंतर, जेव्हा ब्रह्मदेवांचे ध्यान पूर्ण झाले. राजा इंद्रद्युम्नानेत्यांना वंदन केलं आणि मंदिराच्या प्रतिष्ठापना करण्यासाठी आमंत्रित केलं.ब्रह्मदेवांनी ते आनंदाने मान्य केलं. त्यांचा होकार मिळताच राजा खूप आनंदीझाला. ब्रह्मदेवांच्या आगमनाची वार्ता राणी गुंडिचाला सांगण्यासाठी तो आतुरझाला होता. आता तो ब्रह्मलोकाहून पृथ्वीलोकाकडे परत आला.निलांचलमध्ये परत गेल्यावर राजाचा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसलानाही. कारण आता समुद्र किनाऱ्यावर ‘शंखक्षेत्र’ अशा नावाचं कोणतं ठिकाणचअस्तीत्वात नव्हतं. राजाचा राजवाडा, ते भव्य मंदिर आणि राजाने नव्यानेवसवलेली नगरी याचा कोणताही मागमूस दिसत नव्हता. जशी कोणत्याहीसमुद्रकिनार्‍यावर दिसते तशी, चारही बाजूला मैलोनमैल वाळूच वाळू पसरलीहोती. राजाला वाटलं की जणू आपण स्वप्नच बघतो आहोत, कारण काहीतासांपूर्वीच तर तो राणी गुंडीचाशी बोलला होता आणि आता तिथं कोणीचनव्हतं. असं कसं होईल राणी, विद्यापती, विश्वावसू, त्याचं मंत्रीमंडळ, प्रजा,कारागीर आणि हत्ती घोडेसुद्धा तिथून अदृश्य झाले होते.राजा बराच काळ राणी गुंडीचा आणि विद्यापती यांना हाका मारतराहिला. पण काहीच प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी सर्वांच्या विरहाने व्याकूळझालेला राजा तिथेच समुद्रकिनाऱ्याजवळ वाळूत बसला.quotहे परमेश्वरा, आता पुन्हा कोणती परिक्षा घेतो आहेस आता...पुन्हा.. कोणतीपरीक्षा ...quot तो पुन्हा पुन्हा हेच विचारत राहिला.संध्याकाळ झाली तेव्हा त्याने काही लोकांना तिथे पाहिलं. इंद्रद्युम्नत्यांच्याकडे गेला आणि त्या जागेबद्दल विचारू लागला. समोरच्या माणसाने जेसांगितलं, ते ऐकून राजाच्या पायाखालची जमीन सरकली. तो माणूस म्हणाला,quotतुम्ही बहुदा परदेशी आहात असं वाटतं महाशय, . हा उत्कल देश आहे आणियेथे गेल्या चौदा पिढ्यांपासून महापराक्रमी राजा गाल माधव आणि त्यांचापरिवार इथे राज्य करीत आहे.quotराजाने म्हणाला, quotचौदा पिढ्या हे अशक्य आहे. मी तर ऐकलं आहे की राजाइंद्रद्युम्नाचं इथे शासन आहे.quotquotमी कधीही इंद्रद्युम्नाचं नावसुद्धा ऐकलं नाही. क्षमा करा, लोक चुकीच्यापत्त्यावर येतात, तुम्ही कदाचित चुकीच्या ठिकाणी आला आहात महाशय.quotराजाचं दु:ख आता संशयात रूपांतरित झालं . पण त्या माणसाला मूर्ख मानूनराजा पुढे चालू लागला. काही काळ चालल्यानंतर त्याला एका मंदिराचा ध्वजदिसला.quotनक्कीच नक्कीच हे माझं मंदिर आहे. विद्यापति आणि इतर लोकनिश्चितच इथे माझी वाट पाहत असतीलquot असं म्हणत धावत इंद्रद्युम्नमंदिराच्या समोरच्या भागात पोहोचला.. जरी हे त्यानेच भगवान जगन्नाथांसाठीबांधलेलं मंदिर असलं, तरी त्या व्यतिरिक्त आसपास तो ओळखू शकेल असंदुसरं काहीच नव्हतं. सत्य जाणून घेण्यासाठी कासावीस झालेला राजा मंदिराच्याबाहेर बसलेल्या एका ब्राह्मणाजवळ गेला. आता पुन्हा एकदा इंद्रद्युम्नाचीचकित होण्याची पाळी होती.ब्राह्मण म्हणाला, quotराजा गाल माधव यांचं कुलदैवत भगवान विष्णूचं हेमंदिर आहे. बर्‍याच वर्षांपूर्वी, राजाच्या पूर्वजांना हे भव्य मंदिर पूर्णपणे मातीआणि वाळूच्या खाली लुप्त झालेलं सापडलं.”राजाला आश्चर्यचकित झालेलं पाहून ब्राह्मण पुढे म्हणाला,quotअहो महाशय, मला तुमचं कुतूहल समजू शकतं. इतकं मोठं मंदिर जमिनीतकसं काय लुप्त झालं तुला हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे नाquotराजा आपली शुद्ध हरपून बसला होता त्याने कशीबशी मान हलवून ब्राम्हणाला‘होय’ असे उत्तर दिले.ब्राह्मण राजाला म्हणाला, quotऐक तर मग. या मंदिराविषयी एक लोककथासांगितली जाते. ही कथा मी माझ्या आजोबांकडून, माझ्या आजोबांनी त्यांच्याआजोबांकडून ऐकली आहे. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी इथे इंद्रद्युम्न नावाचा एकराजा राज्य करत होता. आमच्या महाराजांप्रमाणे तोसुद्धा निस्सीम विष्णूभक्तहोता. quotहे मंदिर त्यानेच बांधले होते. परंतु प्रतिष्ठापना करण्यापूर्वी, एके दिवशीतो कदाचित ब्रह्मदेवाला आमंत्रित करण्यासाठी ब्रह्मलोकी गेला होता. त्यादिवसापासून आजपर्यंत कोणीही त्याला पाहिलं नाही.quotहे ऐकून इंद्रद्युम्नाला त्याच्या कानांवर विश्वास बसत नव्हता.quotइंद्रद्युम्न राजाची प्रजा, त्याची राणी, मंत्रीमंडळ सर्वजण त्याची प्रतीक्षाकरताकरता मरण पावले, पण तो आला नाही. अशाप्रकारे, अनेक पिढ्यांनंतरत्याचं राज्य हळूहळू काळाच्या उदरात लोप पावलं. त्याने बांधलेलं हे मंदिरहीपूर्णपणे वाळूखाली गाडलं गेलं होतं. एके दिवशी आमच्या राजाच्या घोड्याचीनाल रस्त्यात एका वस्तूवर आदळली आणि राजा जमिनीवर पडला. तिथे खणूनपाहिल्यावर असं दिसून आलं की ते एका मंदिराचं शिखर आहे. बरेच दिवसखोदकाम केल्या नंतर या ठिकाणी भव्य मंदिराची रचना समोर आली. मंदिररिकामं असल्याने राजानं त्याचं कुलदैवत, भगवान विष्णुंच्या मूर्तीची स्थापनाकेली. तेव्हापासून येथे वैष्णवपूजेची परंपरा सुरू झाली.quot ब्राम्हणाने इंद्रद्युम्नालाही कथा सांगितली. तो लहान बालकासारखा रडू लागला.ब्राह्मणानं रडणाऱ्या राजाला विचारलं. quotमहाशय काय झालं तुम्ही त्याचइंद्रद्युम्न राजांचे वंशज आहात काquotquotहे ब्राह्मणश्रेष्ठा, नाही, मी काही वंशज नाही तर मीच तो दुर्दैवी इंद्रद्युम्नआहे.quotहे उत्तर ऐकून, ब्राह्मणाने काही प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी, राजा रडतमंदिराकडे धावू लागला. त्यांच्या मनात आता यात काही शंका नव्हती. ज्याब्रह्मलोकामध्ये एक दिवस पूर्ण झाल्यावर मृत्युलोकात संपूर्ण एक मन्वंतर पूर्णहोतं, तिथे त्याने घालवलेल्या काही काळाची भरपाई म्हणजेच ही एक हजार वर्षराजाला समजलं की तो त्यांना इथे सोडून गेला होता त्या सर्वांचा मृत्यू होऊनशेकडो वर्षे लोटली होती.quotभगवंता, तू माझ्यावर एवढा मोठा अन्याय का केलास कालचक्राच्या याचाकाखाली माझं सारंकाही चिरडलं गेलं आहे. हे निलमाधवा, तुझी ही कोणतीलीला आहे तुला त्याचं उत्तर द्यावंच लागेल...quot राजा आता क्रोधाने आक्रोशकरत मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जात होता. हे दृश्य पाहून तिथे उपस्थितसैनिक राजाला वेडा समजून गाल माधवच्या दरबारात घेऊन गेले.दरबारात त्याची चौकशी केली असता राजा इंद्रद्युम्नाने गाल माधव राजालासंपूर्ण कहाणी सांगितली. पण खचितच कोणी त्याच्या म्हणण्यावर विश्वासठेवला असेल. उलट राजसभेत उपस्थित सर्वच मंत्रीजनांनी त्याची थट्टा केली.काहींनी तर इंद्राद्युम्न शत्रू देशाचा हेर असल्याचाही आरोप केला.quotवृद्धापकाळामुळे तुम्ही मातिभ्रष्ट झाला आहात, जा जा.. तुमच्या याअवस्थेची मला दया येत आहे म्हणून, मी तुम्हाला शिक्षा करत नाही. मात्र जरतुम्ही पुन्हा असा अपराध करताना दिसलात तर तुम्हाला कठोर शिक्षा मिळेल.quotअसं सांगून गाल माधवानी इंद्रद्युम्नाचा अपमान केला आणि इंद्रद्युम्नालाराजदरबारामधून बाहेर काढलं.दिवसभराचं काम पूर्ण केल्यानंतर गाल माधव झोपी गेला तेव्हा रात्री उशिराभगवान विष्णू त्यांच्या स्वप्नात आले, ते म्हणाले,quotअरे मुर्खा, तू तुझ्या अहंकाराने आंधळा झाला आहेस. आज ज्याचा अपमान तूकेलास तो माझा सर्वश्रेष्ठ भक्त इंद्रद्युम्न आहे. त्यानेच माझ्या आदेशानुसार हेमंदिर उभारले. हे मंदिर माझ्या पुरुषोत्तम जगन्नाथ स्वरूपाला समर्पित आहे, जेआजही त्याच्या सर्वश्रेष्ठ भक्ताच्या हस्ते स्थापित होण्याच्या प्रतीक्षेत वाळूतपडून आहे. जा, इंद्रद्युम्नाला सन्मानाने घेऊन ये आणि माझी आणि यामंदिराची विधीपूर्वक प्रतिष्ठापना कर.quotश्री हरी विष्णूची ही आज्ञा ऐकून, गाल माधव लगेच मध्यरात्री इंद्रद्युम्न राजालाशोधण्यासाठी निघाले. बराच शोध घेतल्यानंतर राजा इंद्रद्युम्न दु:खी होऊन मानखाली घालून समुद्राच्या किनाऱ्यावर बसलेला त्यांना दिसला. इंद्रद्युम्नालापाहिल्यावर गाल माधव त्याच्या पाया पडला आणि आपल्या मूर्खपणाबद्दलक्षमा मागितली. त्यानंतर सन्मानपूर्वक राजा इंद्रद्युम्नाला त्यानं आपल्यामहालात आणलं.दुसर्‍या दिवशी सकाळी राजा इंद्रद्युम्न आणि गाल माधव मंदिरात गेले आणिवर्षानुवर्षे लुप्त झालेल्या त्रिमूर्तींचं निश्चित स्थान दाखवण्यासाठी भगवानविष्णूची प्रार्थना करू लागले. ते मंदिरातून बाहेर येताच एक जोरदार वादळ वाहूलागलं. वादळाच्या प्रभाव क्षेत्रापासून थोड्या अंतरावर, वाळूचा मोठा ढीग बाजूलाहोऊ लागला. वाळू दूर झाल्यानंतर प्राचीन मुर्तीशाळा दिसू लागली.हे दृश्य पाहून राजा इंद्रद्युम्नाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. सर्व वाळू बाजूलाझाल्यानंतर मूर्तीशाळेची दारं आपोआप उघडली आणि आतून आलेला दिव्यप्रकाश पाहून सर्वच जण चकित झाले. इतके वर्ष लुप्त झाल्यानंतरही त्रिमूर्तींचंतेज जराही कमी झालं नव्हतं. आयुष्यात प्रथमच विष्णूचं हे अनोखं रूपपाहणार्‍या गाल माधवच्या डोळ्यांतूनही अश्रूधारा वाहू लागल्या.योग्य वेळी देवराज इंद्र आणि देवर्षी नारद यांच्यासमवेत प्रजापिता ब्रह्मदेवतिथे आले.. ब्रह्मदेवाच्या निगराणीखाली वेदांच्या मंत्रोच्चारासह त्रिमूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. द्वापारयुगात जारा आणि अर्जुन यांनी समुद्रातविसर्जित केलेला श्रीकृष्णाच्या अवशेषाने आता एका शक्तीपुंजाच्या रूपातभगवान श्री जगन्नाथांच्या मूर्तीमध्ये प्रवेश केला. हे अलौकिक दृश्य पाहून सर्वदेवदेवता स्वर्गातून फुलांचा वर्षाव करु लागले. राजा इंद्रद्युम्नांनी भगवानजगन्नाथाची प्रतिष्ठापना करण्याचं आपलं शेवटचं कर्तव्य पार पाडून आपल्यानश्वर देहाचा त्याग केला आणि वैकुंठ लोकात विश्वावसूजवळ आपलं स्थानग्रहण केलं.आजही, भगवान जगन्नाथ हे संपूर्ण जगातील एकमेव देवता आहेत ज्यांची मूर्तीचैतन्यमय आहे. श्रीकृष्णाच्या देहाचा तोच अवशेष ज्याला ‘ब्रह्म पदार्थ’म्हणतात तो आजही भगवान जगन्नाथाच्या मूर्तीत आहे, दर बारा वर्षानंतरएखाद्या मनुष्याप्रमाणेच त्रिमूर्तीचे अंत्यसंस्कार केले जातात आणि त्यावेळी श्रीकृष्णाचे अवशेष नव्याने तयार केलेल्या मूर्तीमध्ये स्थापन केले जातात. याप्रक्रियेला नवकलेवर म्हणतात. भगवान नीलमाधवांच्या देववाणी नुसार आजहीविश्वावसूचे वंशजच भगवान जगन्नाथांचे आद्य सेवक आहेत, ज्यांना दैतापतीम्हणतात.

  • Nanda Cow
    9 min 29 sec

    प्राचीन काळी पृथ्वी लोकात प्रभंजन नावाचा एक बलाढ्य राजा होऊन गेला. एकदा तो जंगलात शिकारीसाठी गेला होता. तेव्हा जंगलात फिरत असताना अचानक त्याची दृष्टी एका झुडुपामागच्या हरिणीवर पडली. तिला पाहताच राजानं तिला बाण मारला.बाण लागल्यानं जखमी झालेल्या हरिणीने जेव्हा हातात धनुष्यबाण घेतलेल्या राजा प्रभंजनला पाहिले तेव्हा ती म्हणाली, “अरे मूर्ख राजा, तू हे काय केलंस इथे मी खाली वाकून निर्भिडपणे माझ्या पाडसाला दूध पाजत होते आणि अशा अवस्थेत असताना माझ्या निरपराध जिवाला तू आपल्या बाणाने लक्ष्य केलंस. तू हे पापकर्म केलं आहेस. मी तुला शाप देते की, या जंगलात कच्चं मांस खाणारा प्राणी म्हणून तुला जीवन व्यतीत करावं लागेल. 

  • Birth of Kartikeya
    10 min 3 sec

    सत्ययुगात तारक तारक नावाचा एक असुर होता, त्याने 100 वर्षे अत्यंत कठोर तपश्चर्या केली होती. दर 100 वर्षांनी तो आपली तपश्चर्या अधिक कठीण बनवत नेई. पहिली 100 वर्षे तो पाण्यावर जगला आणि नंतर तो फक्त हवेत जगला.त्याच्या तपश्चर्येने प्रभावित होऊन, भगवान ब्रह्मदेव तारकासुराला तारकासुर वर देण्यासाठी त्यांच्यासमोर प्रकट झाले. आणि म्हणाले, मी तुझी भक्ती आणि तपश्चर्या पाहून प्रसन्न झालो आहे, तुला कोणते वरदान हवे आहे मला सांग आणि ते तुला दिले जाईल  

  • जरसंधाचा जन्म आणि कंसाशी त्याचं नातं.
    8 min 25 sec

    जरासंध मगध देशाचा राज्यकर्ता होता आणि श्रीकृष्णाच्या जीवनाशी त्याचा घनिष्ठ संबंध होता. या कथेत आपण जरासंधाविषयी आणि श्रीकृष्णाशी असलेल्या त्याच्या नात्याविषयी जाणून घेणार आहोत मगधेवर जेव्हा राजा बृहद्रथ राज्य करत होता तेव्हा त्याची प्रजा खूप खुश होती. बृहद्रथाचा विवाह काशीच्या जुळ्या राजकुमारींशी झाला आणि तो एका आनंदी गृहस्थ जीवनात बांधला गेला... जस जसा काळ पुढे सरकत होता तशी राजाच्या मनात पुत्र प्राप्तीची इच्छा वाढू लागली. अखेर बृहद्रथने निर्णय घेतला आणि त्याने आपल्या दोन्ही पत्नींना त्या विषयी सांगण्यासाठी बोलावले. तो म्हणाला, प्रियांनोन, माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका, आपली पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी वनगमन करण्याचा निर्णय घेतला आहे. बृहद्रथाचे बोलणे ऐकून राण्यांना खूपच धक्का बसला परंतु त्यांनी बृहद्रथाचं म्हणणं मान्य केलं.   राजाने आपलं राज्य सोडलं आणि जंगलाचा मार्ग स्वीकारून पायी चालत तो चंडकौशिक ऋषींना शरण गेला. राजानं मनोभावे ऋषींची सेवा करण्यास प्रारंभ केला आणि आपली कर्तव्य संपूर्ण निष्ठेने निभावली. ऋषी त्यांच्या समर्पणाने खूपच प्रसन्न झाले आणि ते राजाला म्हणाले, हे राजन मी तुझ्या समर्पणावर प्रसन्न झालो आहे. तू एक राजा असूनही निकृष्ट दर्जाची कामंही मन लावून केलीस... मी तुला एक वरदान देऊ इच्छितो. सांग तुझी काय इच्छा आहे  राजा बृहद्रथ चंडकौशिक ऋषींना वंदन करून म्हणाला, हे ऋषीवर मी एक निपुत्रिक राजा आहे. मला फक्त एक पुत्र हवा. जो माझ्या राज्याचा वारस बनेल. बस्स माझी एवढीच एक इच्छा आहे. मला पिता व्हायचं आहे . हे ऋषीश्रेष्ठ मला संतान प्राप्तीचं वरदान द्या.  ऋषींनी राजावर दयाभाव दाखवत त्याला एक फळ दिलं आणि सांगितलं की हे फळ तुझ्या कोणत्याही एका पत्नीला दे. राजा ते दैवी फळ घेऊन वनातून आपल्या महाली परत आला. राजाला आपल्या दोन्ही पत्न्याना आनंदित झालेलं पाहायचं होतं. म्हणून त्याने त्या फळाचे दोन समान भाग केले आणि आपल्या दोन्ही पत्न्याना दिले. तत्पश्चात त्या दोघींच्या पोटी अर्धीअर्धी मृत मुलं जन्माला आली.   हे दृश्य पाहून राजा आणि राणींना आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना ते खूपच घाबरले. राजाने आपल्या शिपायांना आदेश दिला ही दोन्ही अर्धी शरीरे घेऊन जा आणि राज्याच्या बाहेर फेकून द्या.  मगध राज्याबाहेर जरा नामक राक्षसीला ती दोन्ही अर्धी शरीरं सापडली. ज्या क्षणी तिने ते दोन भाग वर उचलले त्याक्षणी ते दोन्ही भाग आपापसात जोडले गेले आणि त्यातून एक मूल जीवंत होऊन ते रडू लागलं. जराला एका निर्दोष बालकाची हत्या करायची नव्हती. म्हणून तिने ते मूल राजाला परत दिलं आणि घडलेला चमत्कार सांगितला. जरा राक्षसीच्या नावावरूनच राजाने आपल्या मुलाचं नाव जरासंध असं ठेवलं. 

  • जरासंध वध
    8 min 15 sec

    खांडवप्रस्थ वनात लागलेली आग अग्निदेवांच्या सहाय्याने श्रीकृष्ण आणि अर्जुनाने विझवली. या प्रचंड आगीत आपला जीव वाचल्यामुळे मयासूर राक्षसाने पांडवांना त्यांच्या इंद्रप्रस्थ  नगरीत त्यांची राजधानी बांधण्यासाठी तसेच राजमहाल बांधण्यासाठी मदत केली. मयासूर हा रावणाचा सासरा तर होताच पण त्याचबरोबर तो एक निपूण वास्तु शिल्पकारदेखील होता. सर्व देवदेवता, गंधर्व, राजे आणि ऋषिमुनी हा आलिशान राजमहाल पहायला आले. स्वत: युधिष्ठिराने या सर्वांचे यथोचित आदरातिथ्य केले. त्याचवेळी देवर्षी नारदमुनींच्या उपस्थितीत राजसूय यज्ञ करावा असे युधिष्ठिराच्या मनात आले. त्याने हा विचार आपल्या बंधुंना व दरबारातील मंत्र्यांना बोलून दाखवला. राजसूय यज्ञाबद्दल  ऐकताच सर्वांनी अतिशय आनंदाने होकार दिला. सर्वांनी जरी होकार दिला असला तरी युधिष्ठिराला श्रीकृष्णाच्या परवानगीची आवश्यकता होती. भगवान श्रीकृष्ण येताच युधिष्ठिराने आपला यज्ञाबद्दलचा मानस त्यांना बोलून दाखवला. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजसूय यज्ञ करण्यासाठी लागणाऱ्या सर्व पात्रता तुझ्या अंगी आहेत. परंतू राजसूय यज्ञ करण्याआधी मगध नगरीचा राजा जरासंध याचा तुला वध करावा लागेल. संपूर्ण पृथ्वीवर सत्ता गाजवण्याच्या हेतूने जरासंध महादेवांना प्रसन्न करत आहे. त्यासाठीच तो एका यज्ञाचे आयोजन करत आहे. यज्ञात बळी देण्यासाठी त्याने शेकडो राजांना कैदेत ठेवले आहे. त्यामुळे जरासंध जीवंत असताना तू राजसूय यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडू शकत नाहीस. जरासंध निश्चितपणे तुझ्या यज्ञात विघ्न आणणार. दुष्ट मार्गाने जाणाऱ्या जरासंधाचा नाश होणं आता आवश्यक आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर व इतर पांडवांना म्हणाले,” जरासंधाकडे विशाल सैन्य आहे. त्यामुळे आपण त्याच्याशी थेट युध्दाची घोषणा करू शकत नाही. जरासंध हा ब्राम्हणांना फार मान देतो. त्यामुळे आपण ब्राम्हणांचा वेश धारण करून त्याच्यासमोर जाऊया. अर्जुन आणि भीम तुम्हीदेखील माझ्यासोबत चला.” श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीम तिघेही ब्राम्हणाचा वेश धारण करून जरासंधाच्या महाली पोचले. आपल्या ताकदीचा जरासंधाला गर्व असला तरीही त्याने या तीन ब्राम्हणांना पाहून आदराने मान झुकवून नमस्कार केला. भगवान श्रीकृष्ण,अर्जुन आणि भीम यांच्याकडे पाहत, जरासंधाला म्हणाले, या दोन ब्राम्हणांचे आज मध्यरात्रीपर्यंत मौन आहे. जरासंधाने जराही विलंब न करता या तिन्ही ब्राम्हणांची एका कक्षात सोय केली व मध्यरात्र उलटण्याची वाट पाहू लागला. काही काळाने जरासंध या ब्राम्हणांच्या कक्षात आला आणि म्हणाला, जरी तुम्ही ब्राम्हणाचा वेश धारण केला असला तरी तुमच्यात क्षत्रियत्व दिसत आहे. तुमचे सत्य मला समजलेच पाहिजे.

  • अहिल्या
    6 min 36 sec

    गौतम नारि श्राप बस उपल देह धरि धीर।चरन कमल रज चाहति कृपा करहु रघुबीर।।वैदिक भारतातील काही सुंदर स्त्रीयांमध्ये अहिल्या देवीचे नाव घेतले जाते. अहिल्या ही सृष्टिचे निर्माता ब्रम्हदेवांची मानस कन्या. तिचे पती गौतम ऋषि यांनी तिला, ती दगड होईल असा शाप दिला. पतीने दिलेल्या या शापामुळे अनेक वर्ष अहिल्या दगडाची एक मूर्ती बनून राहिली. शेवटी त्रेतायुगात भगवान श्रीरामांनी आपल्या स्पर्शानं तिचा उध्दार केला. गौतम ऋषिंनी अहिलेल्या का दिला असेल दगड होण्याचा शाप  ऐकूया रामायणातील देवी अहिल्येची कथा. रामायणामध्ये ही कथा ब्रह्मर्षि विश्वामित्र यांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना सांगितली होती. ब्रम्हदेवांची मानस कन्या अहिल्येचं सौंदर्य अपरिमित होते. रूपानं आणि गुणानं कोणत्याही स्त्रीसोबत तिची तुलना होऊ शकत नव्हती. ब्रम्हदेवांच्या आशिर्वादानं अहिल्या देवीचा विवाह महर्षि गौतमांसोबत झाला. ते दोघेजण मिथिला नगरीजवळ एका आश्रमात राहू लागले. एके दिवशी देवराज इंद्र, गौतम ऋषिंच्या आश्रमाजवळून जात होता. त्यावेळी त्यांची दृष्टी अत्यंत सुंदर अश्या अहिल्येवर पडली. देवी अहिल्येला पाहून इंद्राची वासनाचाळवली. तो स्वतःला आवरू शकला नाही. त्यांनं कोणत्याही परिस्थितीत अहिलेल्या मिळवायचंच असा निर्धार केला. त्यानंतर एके दिवशी ब्राह्ममुहूर्ताच्या आधी प्रातःकाली कोंबड्याचा आवाज काढून त्यानं गौतम ऋषिंना चकवलं. गौतम ऋषिंना वाटलं की ब्रह्ममुहूर्त झाला आणि म्हणून ते नदीवर स्नानासाठी निघून गेले 

  • देवराज नहुष
    13 min 27 sec

    भूलोकी अनेक वर्ष धर्माने राज्य करून शौर्य आणि वैभव अर्जित केल्यानंतर असं काय घडलं ज्यामुळे नहुष महाराजांना देवांचा राजा बनावं लागलं. पहा कसा होता देवराजा नहुषाचा कार्यकाल...     युगानुयुगे स्वर्गलोकवर राज्य केल्यानंतर इंद्रला ऐश्वर्याची चटक लागली होती आणि त्याच्या मनात या बद्दल अहंकार जागा झाला. एका काय झालं, इंद्रलोकी नेहेमी प्रमाणे उत्सवाचं वातावरण होतं. देवी शची सह आपल्या आसनावर विराजमान झालेला इंद्र नृत्य आणि गायनाचा आनंद घेत होता. देवता, ऋषि, मुनी, मरुदगण, दिग्पाल, गंधर्व, नाग तथा अप्सरा चारही बाजूंनी इंद्रची पूजा करण्यात मग्न होते. आधीच गर्वाने फुगलेल्या इंद्राला या जयजय कारामुळे अजूनच उकळ्या फुटत होत्या. त्याच वेळी देवगुरू बृहस्पतींच इंद्रलोकी आगमन झालं, देवगुरूना येताना पाहून ना इंद्राने उठून त्यांना अभिवादन केलं की ना बृहस्पतींना आसन ग्रहण करण्यास आमंत्रण दिलं. 

Language

Marathi

Genre

Mythology

Seasons

1